शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

'नक्षलवाद्यांनो, बुलेटचा मार्ग सोडून बॅलेटचा मार्ग स्वीकारा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 18:36 IST

नक्षलवाद्यांनी निवडणुकीला विरोध करताना काही भागात कार्यकर्त्यांवर पोलिसांवर हल्ले केले आहेत. या हल्ल्याचा निषेध करत आठवले यांनी नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात यावं असं आवाहन केलं आहे. 

रायपूर - नक्षलवाद्यांना जर गरीब आदिवासींना न्याय द्यायचा असेल तर त्यांनी नक्षलवाद सोडून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या लोकशाहीच्या आणि शांततेच्या मार्गाने देशाच्या मुख्य प्रवाहात यावं असं आवाहन रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी नक्षलवाद्यांना केलं आहे. तसेच नक्षलवाद्यांनी बुलेटचा मार्ग सोडून बॅलेटचा मार्ग स्वीकारावा असंही आठवले म्हणाले. 

छत्तीसगडमध्ये रिपब्लिकन पक्षाचे २ उमेदवार लोकसभा निवडणूक लढत आहेत त्यांच्या प्रचारासाठी आयोजित रिपब्लिकन पक्षाच्या जाहीर सभेत रामदास आठवले बोलत होते. छत्तीसगडमध्ये लोकसभेच्या ११ जागा असून त्यापैकी २ जागांवर रिपब्लिकन पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत आहे तर अन्य ९ जागांवर भारतीय जनता पार्टीला आरपीआयने पाठिंबा दिला आहे. 

छत्तीसगडमध्ये भाजपाच्या यंदा किमान 8 जागा निश्चित निवडून येतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील 5 वर्षांत चांगले काम केले असून त्यांना पुन्हा केंद्रात देशसेवेची संधी देण्यासाठी भाजप एनडीएच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन आरपीआय नेते रामदास आठवले यांनी केले. नक्षलवाद्यांनी निवडणुकीला विरोध करताना काही भागात कार्यकर्त्यांवर पोलिसांवर हल्ले केले आहेत. या हल्ल्याचा निषेध करत आठवले यांनी नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात यावं असं आवाहन केलं आहे. 

काही दिवसांपूर्वीच छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी भाजपा आमदाराच्या ताफ्यावर हल्ला केला होता. नक्षलवाद्यांच्या या हल्ल्यात भाजपा आमदार भीमा मांडवी यांचा आणि त्यांच्या गाडीचालकाचा मृत्यू झाला होता तर तीन जवान शहीद झाले होते. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Ramdas Athawaleरामदास आठवलेnaxaliteनक्षलवादीChhattisgarhछत्तीसगडChhattisgarh Lok Sabha Election 2019छत्तीसगढ लोकसभा निवडणूक 2019