शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न पुरस्कार; शरद पवार म्हणाले, अतिशय योग्य निवड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2024 13:50 IST

सार्वजनिक जीवनात स्वच्छ चारित्र्याची व्यक्ती म्हणून त्यांचा लौकिक होता, अशा शब्दांत शरद पवार यांनी अडवाणी यांचं कौतुक केलं आहे.

NCP Sharad Pawar ( Marathi News ) : भाजप नेते आणि भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्र सरकारकडून याबाबतची घोषणा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी लालकृष्ण अडवाणी यांचं अभिनंदन केलं. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनीही या पुरस्कारासाठी अडवाणी यांची निवड योग्य असल्याचं सांगत त्यांचं अभिनंदन केलं आहे.

"भारतरत्न पुरस्कारासाठी कर्पुरी ठाकूर आणि लालकृष्ण अडवाणी या दोन व्यक्तींची झालेली निवड अतिशय योग्य आहे. कर्पुरी ठाकूर यांनी समाजातील दुबळ्या वर्गासाठी काम केलं. १९७८ साली मी महाराष्ट्रचा मुख्यमंत्री झालो, तेव्हा कर्पुरी ठाकूर हे बिहारचे मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये अनेकदा आमची चर्चा होत असत. अतिशय साधे आणि विनम्र, मात्र विचाराबाबत अत्यंत भक्कम असं त्यांचं व्यक्तिमत्त्व होतं. त्यामुळे त्यांची निवड ही योग्यच आहे. दुसरीकडे, लालकृष्ण अडवाणी हे अनेक वर्ष देशाच्या संसदेत होते. ते दिल्लीतून निवडूनही गेले होते. एखादा-दुसरा अपवाद सोडला तर त्यांचा कधी पराभव झाला नाही. सार्वजनिक जीवनात स्वच्छ चारित्र्याची व्यक्ती म्हणून त्यांचा लौकिक होता," अशा शब्दांत शरद पवार यांनी लालकृष्ण अडवाणी यांचं कौतुक केलं आहे.

भारतरत्न पुरस्काराबद्दल लालकृष्ण अडवाणी यांचं अभिनंदन करत असताना शरद पवार यांनी त्यांच्यासोबत झालेल्या मतभेदांवरही भाष्य केलं. "आमच्यात आणि त्यांच्यात एका गोष्टीचे मतभेद झाले. अडवाणी यांनी रथयात्रा काढली आणि या यात्रेचा परिणाम म्हणून देशात काही न घडाव्यात अशा घटना घडल्या. तेवढा अपवाद सोडला तर अडवाणी यांचं सबंध जीवन हे भाजपचे नेते म्हणून, संसदेचे सदस्य म्हणून आणि केंद्रीय मंत्री म्हणूनही आदर्शवत होतं. त्यांच्या निवडीला उशीर झाला असला तरी ही अतिशय योग्य निवड आहे. त्यामुळे मी लालकृष्ण अडवाणी यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांचं अभिनंदन करतो," असं पवार म्हणाले.

नरेंद्र मोदी काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल लालकृष्ण अडवाणी यांचं अभिनंदन केलं आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि थोर समाजवादी नेते कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर 'भारतरत्न' देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता अडवाणी यांनाही भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. लालकृष्ण अडवाणी यांचं अभिनंदन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे की, "श्री. लालकृष्ण अडवाणी यांचा भारतरत्न पुरस्काराने सन्मान होत असल्याने मी खूप खूश आहे. मी त्यांच्याशी बोलून हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं आहे. ते आपल्या काळातील सर्वाधिक आदर असणारे राजकीय नेते असून भारताच्या विकासात त्यांचं मोठं योगदान राहिलं आहे. तळागाळात काम करण्यापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास देशाच्या उपपंतप्रधान होण्यापर्यंत पोहोचला. त्यांनी देशाचे गृहमंत्री व  माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणूनही काम पाहिलं आहे. अडवाणी यांची संसदीय कारकीर्दही समृद्ध राहिलेली आहे," अशा शब्दांत नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण अडवाणी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारLal Krishna Advaniलालकृष्ण अडवाणीBharat Ratnaभारतरत्न