शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

"एनडीएकडे बहुमत, आम्हा सर्वांचा सभापतींवर विश्वास", जगदीप धनखड यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावावर किरेन रिजिजू संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 20:42 IST

Kiren Rijiju : किरेन रिजिजू यांनी मंगळवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

नवी दिल्ली : राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांना पदावरुन हटवण्यासाठी विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणला आहे. विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावावर 60 सदस्यांच्या सह्या असून, त्यांनी राज्यसभेच्या महासचिवांकडे हा प्रस्ताव सादर केला आहे. यावरून केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधकांवर निशाणा साधत विरोधी 'इंडिया'आघाडीने केलेली कृती अत्यंत खेदजनक असल्याचे म्हटले आहे.

किरेन रिजिजू यांनी मंगळवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी, सरकारला जगदीप धनखड यांचा खूप अभिमान आहे. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे पदसिद्ध सभापती हे अतिशय निष्पक्ष असतात. राज्यसभा असो किंवा लोकसभा विरोधकांनी सभापतींच्या प्रतिष्ठेचा अनादर केला आहे. काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या आघाडीने सभापतींच्या सूचनांचे पालन न करून सातत्याने गैरवर्तन केले आहे, असे किरेन रिजिजू म्हणाले.

सभापती जगदीप धनखड हे सामान्य पार्श्वभूमीतून आले आहेत. ते नेहमी संसदेच्या आत आणि बाहेर शेतकरी आणि लोकांच्या हिताबद्दल बोलतात. ते आम्हाला मार्गदर्शन करतात. आम्ही त्यांचा आदर करतो. जो प्रस्ताव देण्यात आला आहे आणि ज्या 60 खासदारांनी त्यावर स्वाक्षरी केली आहे. त्या 60 खासदारांच्या कृतीचा मी निषेध करतो. एनडीएकडे बहुमत आहे आणि आम्हा सर्वांचा सभापतींवर विश्वास आहे. त्यांनी ज्या पद्धतीने सभागृहाचे मार्गदर्शन केले आहे, त्यामुळे आम्ही आनंदी आहोत, असे किरेन रिजिजू यांनी सांगितले. 

दरम्यान, पहिल्यांदाच राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांना पदावरुन हटवण्यासाठी विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणला आहे. विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावावर 60 सदस्यांच्या सह्या असून, त्यांनी राज्यसभेच्या महासचिवांकडे हा प्रस्ताव सादर केला आहे. जर हा प्रस्ताव मांडला गेला तर तो मंजूर करण्यासाठी या पक्षांना साधारण बहुमताची आवश्यकता असेल, परंतु 243 सदस्यांच्या सभागृहात त्यांच्याकडे आवश्यक संख्या नाही.

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाParliamentसंसदBJPभाजपा