शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
2
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
3
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
4
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
5
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
6
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
7
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
8
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
10
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
11
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
12
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
13
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
14
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
15
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
16
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
17
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
18
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
19
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
20
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'

मध्यावधी निवडणुका झाल्यास एनडीएला मिळणार 360 जागा

By admin | Published: January 26, 2017 11:01 PM

लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका झाल्यास एनडीए पुन्हा 360 खासदारांसह केंद्रातील सत्तेत येऊ शकते.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 26 - केंद्रातल्या मोदी सरकारला जवळपास अडीच वर्षांहून अधिक काळ लोटला. मात्र तरीही त्यांची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली दिसत नाही. इंडिया टुडे ग्रुप आणि KARVY INSIGHTS च्या सर्व्हेनुसार लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका झाल्यास एनडीए पुन्हा 360 खासदारांसह केंद्रातील सत्तेत येऊ शकते. यूपीएला 60 जागा, तर इतर पक्षांना 123 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 19 राज्यांमधील 12,143 लोकांनी केलेल्या सर्व्हेनुसार आता निवडणुका लागल्यास भाजपा नेतृत्वाखालील एनडीएला 42 टक्के मतं मिळाली आहेत. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखाली यूपीएला फक्त 25 टक्के मतं मिळाली आहेत. यूपीएच्या तुलनेत एनडीए दिवसेंदिवस मजबूत होत असल्याचं या पोलमधून समोर आलं आहे. इतर पक्षांना 33 टक्के मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पंतप्रधान म्हणून मोदी चांगलं काम करत असल्याचं 69 टक्के लोकांनी म्हटलं आहे. तसेच मोदींच्या कामाला 19 टक्के लोकांनी सरासरी पसंती दिली आहे. तर 3 टक्के लोकांनी कामगिरी वाईट, 6 टक्के लोकांनी अतिशय वाईट अशी प्रतिक्रिया दिली आहे. एनडीए सरकारच्या कामाला 71 टक्के लोकांनी चांगलं म्हटलं आहे. 97 संसदीय आणि 194 विधानसभा क्षेत्रात करण्यात आलेल्या सर्व्हेनुसार पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून योग्य पर्याय असतील. पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मोदींना 65 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. तर राहुल गांधींना फक्त 10 टक्के, तर सोनिया गांधींना 4 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. मुलायम सिंह यादव, मायावतींना प्रत्येकी 1 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. अरुण जेटलींना 2 टक्के लोक पंतप्रधानपदाचे उमेदवार मानतात. तर केजरीवाल, प्रियंका, नितीशकुमार यांना 2 टक्के लोकांनी निवडलं आहे. नोटाबंदीच्या मोदींच्या निर्णयामुळे 45 टक्के लोकांनी काळा पैशाला आळा बसल्याचं म्हटलं आहे. तर 35 टक्के लोकांनी अर्थव्यवस्था सुधारल्याचं मत मांडलं आहे. अरुण जेटलींच्या कामाला 23 टक्के, तर सुषमा स्वराज आणि राजनाथ सिंह यांच्या कारभाराला 21 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. मनोहर पर्रिकरांना 13 टक्के तर उमा भारतींनी 12 टक्के चांगलं काम केल्याचं म्हटलं आहे. मोदींविरोधात तिसरा पर्याय म्हणून 11 टक्के लोकांनी केजरीवालांना पसंती दिली आहे. नितीशकुमारच्या नेतृत्वात 10 टक्के लोकांना चांगलं भविष्य दिसत आहे.