शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

"बिहारमध्येही एनडीएचा विजय होणार", दिल्लीतील भाजपच्या यशानंतर चिराग पासवान यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 17:46 IST

Chirag Paswan : चिराग पासवान यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत विजयाचा दावा केला असून एनडीए युती निवडणुकीत किती जागा जिंकेल, याचा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे.

Chirag Paswan : नुकत्याच पार पडलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवला. या विजयानंतर भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आता या वर्षाच्या अखेरीस बिहार विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीतही एनडीएतील घटक पक्षांना विजयाबद्दल पूर्ण विश्वास आहे. 

आगामी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एनडीएतील घटक पक्ष असलेल्या लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) प्रमुख आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी एक मोठा दावा केला आहे. चिराग पासवान यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत विजयाचा दावा केला असून एनडीए युती निवडणुकीत किती जागा जिंकेल, याचा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे.

चिराग पासवान म्हणाले की, दिल्ली विधानसभा निवडणुकीत एनडीएचा निकाल पाहून आम्ही नैतिकदृष्ट्या भारावून गेलो आहोत. आम्ही बिहारच्या निवडणुकांमध्ये सुद्धा उत्साहाने सहभागी होणार आहोत. दिल्लीत एनडीएला मिळालेला विजय हाच आहे. २७ वर्षांनंतर दिल्लीत एनडीएचे सरकार स्थापन झाले आहे. दिल्ली, हरयाणा आणि महाराष्ट्राच्या निवडणूक निकालांप्रमाणेच बिहारमध्येही असेच निकाल दिसतील.

पुढे चिराग पासवान यांनी सांगितले की, बिहारमध्ये आमची युती मजबूत आहे. भाजप, जेडीयू, एलजेपी (रामविलास), जीतन राम मांझी आणि उपेंद्र कुशवाह यांचा पक्ष, अशा ५ पक्षांमध्ये विजयी युती आहे. मी सतत बिहारला भेट देत आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत आम्ही २२५ हून अधिक जागा जिंकून सरकार स्थापन करू. तसेच, इतर एनडीएतील पक्षांनाही तोच विश्वास आहे, असे चिराग पासवान म्हणाले.

बिहारमध्ये एनडीएचे सरकार येईल - गिरीराज सिंहदुसरीकडे, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनीही बिहारमध्ये एनडीए युती पुन्हा एकदा सत्तेत येईल, असा दावा केला आहे. गिरीराज सिंह म्हणाले, बिहारमध्ये एनडीएचे सरकार आहे आणि फक्त एनडीएचे सरकारच स्थापन होईल. दरम्यान, या वर्षाच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.

टॅग्स :chirag paswanचिराग पासवानBiharबिहारBJPभाजपा