शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

भारतीय दंड संहितेत बदल करण्याची गरज - राष्ट्रपती प्रणब मुखर्जी

By admin | Published: February 27, 2016 8:00 PM

देशद्रोह कायद्यावरुन देशभरात चर्चा सुरु असताना राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी भारतीय दंड संहितेत (आयपीसी) बदल करण्याची गरज असल्यांच सुचवलं आहे

ऑनलाइन लोकमत - 
कोच्ची, दि. 27 - देशद्रोह कायद्यावरुन देशभरात चर्चा सुरु असताना राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी भारतीय दंड संहितेत (आयपीसी) बदल करण्याची गरज असल्यांच सुचवलं आहे. 21 व्या शतकातल्या गरजांची पुर्तता करण्यासाठी भारतीय दंड संहितेची उजळणी करण्याची गरज आहे. तसंच गेली अनेक वर्ष पारंपारिक पद्धतीने सुरु असलेल्या पोलीस व्यवस्थेतदेखील बदल करण्याची गरज असल्याचं राष्ट्रपती प्रणब मुखर्जी बोलले आहेत. 
 
गेल्या 155 वर्षात आयपीसीमध्ये फार कमी बदल झाले आहेत. खुप कमी गुन्ह्यांची प्राथमिक गुन्ह्यांच्या तसंच शिक्षापात्र यादीत नोंद झाली असल्याचं राष्ट्रपती प्रणब मुखर्जी बोलले आहेत. भारतीय दंड संहितेची 155 वर्ष साजरे करण्यासाठी कोच्चीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. 
 
अजूनही ब्रिटिशांनी त्यांच्या फायद्यासाठी लागू केलेले नियम आपल्या संहितेत आहेत. तर दुसरीकडे अनेक नवे गुन्हे समोर आले आहेत ज्यांची व्याख्या तयार करुन त्यांचा संहितेत समावेश करणं गरजेचं आहे असं मत राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी व्यक्त केलं आहे. आर्थिक गुन्ह्यांमुळे देशाच्या विकास, प्रगतीत अडथळे येत असल्याचंदेखील राष्ट्रपती प्रणब मुखर्जी बोलले आहेत. जेएनयूमधील विद्यार्थ्यांवर देशद्रोहाच्या अंतर्गत कारवाई करण्यात आल्यानंतर कलम 124 ए मध्ये बदल करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात करण्यात येत होती. 
 
पोलिसांनी केलेल्या कारवाईवर त्यांची प्रतिमा बनते, पोलिसांनी कायदा लागू करण्याच्या एकेरी भुमिकेतून पुढे जाण्याची गरज असल्याचं राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी सांगितल. भारतीय दंड संहिता 1 जानेवारी 1862 पासून लागू करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला केरळचे राज्यपाल पी सदाशिवम, मुख्यमंत्री ओमन चंडी उपस्थित होते.