शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

कोरोना लसीकरणात निष्काळजीपणा, 6 कोटी नागरिकांनी अद्याप घेतला नाही दुसरा डोस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2021 12:49 IST

Corona Vaccination: देशात आतापर्यंत 85 कोटींहून अधिक लसीचे डोस देण्यात आले आहेत. यापैकी दुसऱ्या डोसचा आकडा 22.50 कोटींपेक्षा जास्त आहे.

नवी दिल्ली: देशात सध्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण अभियान राबवले जात आहे.लोकांना लस घेण्यासाठी प्रेरित केले जात आहे. पण, यात एक निष्काळजीपणा समोर आला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितनुसार, लसीकरण मोहिमेअंतर्गत शनिवारी कोरोना लसीचे 62 लाख डोस देण्यात आले आहेत. यानंतर, देशात दिलेल्या एकूण डोसची संख्या 85 कोटी ओलांडली आहे. पण, देशातील 6.12 कोटी लोकांनी आतापर्यंत दुसरा डोस घेतला नसल्याचं समोर आलं आहे. 

रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! तिकीट बुकिंग झालं सोपं, रेल्वेनं सुरू केली 'ही' नवीन सुविधा

मिळालेल्या माहितीनुसार, 6.12 कोटी लस न घेतलेल्या नागरिकांपैकी 10 टक्के लोकांनी कोव्हॅक्सीनचा पहिला डोस घेतला आहे. या लोकांना 42 दिवसांच्या आत दुसरा डोस घ्यायचा होता. पण, त्यांनी अद्याप दुसरा डोस घेतलेला नाही. मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात लसीकरणाअंतर्गत 63,04,33,142 नागरिकांना पहिला आणि 22,50,45,137 लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. या आकडेवारीनुसार, आतापर्यंत 28 कोटी लोकांना दुसरा डोस मिळायला हवा होता. पण, लोकांच्या निष्काळजीपणामुळे हा आकडा खुप मागे आहे.

बलुचिस्तान लिबरेशन फ्रंटचा पाकिस्तानी सैन्यावर मोठा हल्ला, अनेक सैनिक ठार

मीडिया रिपोर्टनुसार, छत्तीसगडमधील 36.70 लाख लोकांनी लसीचा दुसरा डोस घेतलेला नाही. झारखंडमध्ये हा आकडा 22.29 लाख आहे. उत्तर प्रदेशात 98.56 लाख आहे. तर राजस्थानमध्ये ते 66.78 लाख आहे. बिहारमध्ये असे 41.13 लाख लोक आहेत. मध्य प्रदेशात हा आकडा 51.82 लाख आहे. तसेच, महाराष्ट्रात 41.75 लाख लोकांनी लसीचा दुसरा डोस घेतलेला नाही. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस