शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

पाठ्यपुस्तकातून नेहरूंना वगळले

By admin | Published: May 09, 2016 3:14 AM

भाजपाशासित राजस्थानमध्ये इयत्ता आठवीच्या नव्या पाठ्यपुस्तकामधून भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचे नाव वगळण्यात आले आहे.

जयपूर : भाजपाशासित राजस्थानमध्ये इयत्ता आठवीच्या नव्या पाठ्यपुस्तकामधून भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचे नाव वगळण्यात आले आहे. या आधीच्या पाठ्यपुस्तकात मात्र नेहरूंबाबत लिहिले होते. नेहरूंनी बॅरिस्टर बनल्यानंतर स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली आणि नंतर ते काँग्रेसचे अध्यक्षही बनले, तसेच ते स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते, असे आधीच्या पुस्तकात म्हटले होते.राजस्थान माध्यमिक शिक्षण मंडळ, अजमेरशी संबंधित इयत्ता आठवीच्या सामाजिक विज्ञानच्या सुधारित पुस्तकात नेहरूंबाबत कोणताही उल्लेख नाही. हे पुस्तक अद्याप बाजारात उपलब्ध झालेले नाही, पण हे पुस्तक राजस्थान पाठ्यपुस्तक मंडळाच्या वेबसाइटवर अपलोड करण्यात आले आहे.या संशोधित पुस्तकात स्वातंत्र्य संग्राम सेनानी हेमू कलानी यांचे नाव जोडण्यात आले आहे. त्यासोबतच स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा गांधी, शहीद भगतसिंग, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस आदी अन्य नावांचा मात्र उल्लेख आहे, परंतु पं. नेहरूंचे नाव अथवा स्वातंत्र्य लढ्याबाबतच्या धड्यात आणि स्वातंत्र्योत्तर काळातील घटनांमध्ये त्यांचा नामोल्लेख नाही.