शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी?
2
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
3
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
4
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
5
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
6
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
7
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
8
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
10
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
11
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
12
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
13
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
14
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
15
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
16
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
17
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
18
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
19
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
20
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...

"ना केजरीवालांनी इन्सुलिन मागितलं, ना एम्सच्या डॉक्टरांनी..."; तिहार जेल प्रशासनाचं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2024 16:41 IST

Avind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांनी मिठाई, लाडू, केळी, आंबे, तळलेले अन्न, चहा, लोणचं इत्यादी उच्च कोलेस्टेरॉलयुक्त पदार्थ खाऊ नयेत असे तिहार तुरुंग प्रशासनाने एम्सला पत्र लिहिले आहे.

तिहार तुरुंगातील सूत्रांनी रविवारी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल एम्सच्या वरिष्ठ डायबेटोलॉजिस्टकडून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कंसल्टेशन देण्यात आलं आहे. तुरुंगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 40 मिनिटांच्या कंसल्टेशननंतर डॉक्टरांनी अरविंद केजरीवाल यांना कोणतीही गंभीर चिंता करण्याच कारण नसल्याचं सांगितलं आणि त्यांना सांगितलेली औषधं सुरू ठेवण्याचा सल्ला दिला. जेल प्रशासन त्यांच्या प्रकृतीवर नियमितपणे लक्ष ठेवून आहे.

सुनीता केजरीवाल यांच्या विनंतीवरून तिहार तुरुंग प्रशासनाने दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचं VC मार्फत डॉक्टरांशी कंसल्टेशन केलं. एम्सच्या वरिष्ठ तज्ञांव्यतिरिक्त, आरएमओ तिहार आणि एमओ तिहार हे व्हीसी दरम्यान उपस्थित होते. डॉक्टरांनी CGM (ग्लूकोज मॉनिटरिंग सेन्सर) चे रेकॉर्ड आणि केजरीवाल यांनी घेतलेल्या आहार आणि औषधांचा रेकॉर्ड घेतला. या काळात अरविंद केजरीवाल यांनी इन्सुलिनचा मुद्दा उपस्थित केला नाही किंवा डॉक्टरांनी त्यांना ते वापरण्यास सुचवले नाही.

तिहारच्या सूत्रांच्या वक्तव्यावर आम आदमी पार्टीची प्रतिक्रियाही समोर आली आहे. आपच्या सूत्रांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, तिहार तुरुंग प्रशासनाने मान्य केले आहे की मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 20 दिवस डायबेटीस तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवण्यात आलं नाही. त्यांच्या जीवाला जाणीवपूर्वक धोका निर्माण केला जात आहे. त्याची शुगर लेव्हल 300 आहे, मग त्यांना इन्सुलिन का दिले जात नाही? आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी काल पत्रकार परिषद घेऊन जेलमध्ये असलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट केंद्र सरकारने रचल्याचा आरोप केला.

संजय सिंह म्हणाले, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तिहार तुरुंगात इन्सुलिन दिले जात नाही. डायबेटीसच्या रुग्णाला वेळेवर इन्सुलिन न दिल्यास त्या व्यक्तीसाठी जीवन किंवा मृत्यूचा प्रश्न निर्माण होतो. त्यांना मारण्याचा कट रचला जात आहे. या गुन्ह्याचे उत्तर दिल्लीतील जनता देईल. आप नेत्यांच्या आरोपांदरम्यान, तिहार जेल प्रशासनाने शनिवारी दिल्लीच्या उपराज्यपालांना सीएम केजरीवाल यांच्या प्रकृतीबाबत अहवाल सादर केला, जे यावर्षी 1 एप्रिलपासून तिहार जेलमध्ये आहेत.

त्या अहवालानुसार, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तेलंगणातील डॉक्टरांच्या सल्ल्याने इन्सुलिन रिव्हर्सल प्रोग्रामवर होते. त्यांच्या अटकेच्या खूप आधी डॉक्टरांनी त्यांचा इन्सुलिनचा डोस बंद केला होता. त्यांच्या अटकेच्या वेळी, ते फक्त मेटफॉर्मिन ही गोळी घेत होते. केजरीवाल यांची तपासणी केल्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांनी असेही सांगितले की, केजरीवाल यांना न्यायालयीन कोठडीत ठेवल्यापासून त्यांची शुगर लेव्हल चिंताजनक नाही आणि त्यांना इन्सुलिन घेण्याची गरज नाही.

अरविंद केजरीवाल यांनी मिठाई, लाडू, केळी, आंबे, तळलेले अन्न, चहा, लोणचं इत्यादी उच्च कोलेस्टेरॉलयुक्त पदार्थ खाऊ नयेत असे तिहार तुरुंग प्रशासनाने एम्सला पत्र लिहिले आहे. त्यांच्यासाठी हेल्दी डाइट प्लॅन विचारण्यात आला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात जेलमध्ये आहेत.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालjailतुरुंगAAPआप