शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

भारताच्या नोटाबंदीमुळे नेपाळ आर्थिक संकटात

By admin | Published: January 15, 2017 12:19 AM

चलनातून ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा बाद करण्याच्या भारताच्या निर्णयामुळे शेजारच्या नेपाळमध्ये संकट उभे ठाकले आहे. आपल्याकडील ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा

- नितीन अग्रवाल,  नवी दिल्ली

चलनातून ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा बाद करण्याच्या भारताच्या निर्णयामुळे शेजारच्या नेपाळमध्ये संकट उभे ठाकले आहे. आपल्याकडील ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा भारताकडून बदलून घेण्यासाठी सतत प्रयत्न करीत असलेल्या नेपाळने लवकरच हा प्रश्न सुटला नाही तर नेपाळी लोकांचा भारतावरील विश्वास उडून जाईल, असा इशारा दिला आहे.नेपाळचे भारतातील राजदूत दीप कुमार उपाध्याय म्हणाले की, भारत सरकारला विनंती करतो की हा प्रश्न लवकर सोडवावा अन्यथा नेपाळी लोकांचा आधी नेपाळ सरकारवरून आणि भारत सरकारवरील विश्वास उडून जाईल.’’ ते म्हणाले की, नोटाबंदीमुळे नेपाळमध्ये लोकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी नेपाळ राष्ट्र बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरांच्या नेतृत्वाखाली अर्थ आणि परराष्ट्र मंत्रालयाचे अनेक वरिष्ठ अधिकारी भारतात येऊन गेले. हे अधिकारी रिझर्व्ह बँक, अर्थ आणि परराष्ट्र मंत्रालयाशी उत्तर शोधण्यासाठी चर्चा करीत आहेत. आम्ही हा प्रश्न सोडवू, असे आश्वासन भारत सरकारने आम्हाला दिली असल्याची माहितीही उपाध्याय यांनी दिली. (लोकमत न्यूज नेटवर्क)- नेपाळ भारतीय रिझर्व्ह बँकेकडून दरवर्षी अमेरिकन डॉलरच्या बदल्यात सरासरी ६०० कोटी रुपये मूल्यांच्या भारतीय नोटा घेतो. भारताच्या निर्णयामुळे नेपाळ राष्ट्र बँकेची फार मोठी रक्कम चलनातून बाद झाली आहे. नेपाळमध्ये काही लोक घसघशीत कमिशन घेऊन भारतीय नोटांना नेपाळी चलनात बदलून देत आहेत. भारताच्या आश्वासनावर विश्वास ठेवून दीप कुमार उपाध्याय यांनी नेपाळी लोकांना त्यांनी घाईगर्दीत आपल्याकडील पैशांचे नुकसान करून घेऊ नये, असे आवाहन केले.