शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
3
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
4
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
5
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
6
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
7
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
8
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
9
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
10
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
11
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
12
'लाफ्टर शेफ' शोला लागली नजर? एकानंतर एक सेलिब्रिटींसोबत अपघात; राहुल वैद्यच्या चेहऱ्यावर...
13
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
14
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
15
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
16
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
17
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
18
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
19
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
20
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज

विमान अपघातातून नेताजी बचावले होते !

By admin | Published: April 01, 2016 12:53 AM

नेताजी सुभाषचंद्र बोस हे १८ आॅगस्ट १९४५ मध्ये तायवान येथे घडलेल्या विमान अपघातातून सुखरूप बचावले होते, असे स्पष्ट संकेत मोदी सरकारने मंगळवारी सार्वजनिक केलेल्या

हैदराबाद : नेताजी सुभाषचंद्र बोस हे १८ आॅगस्ट १९४५ मध्ये तायवान येथे घडलेल्या विमान अपघातातून सुखरूप बचावले होते, असे स्पष्ट संकेत मोदी सरकारने मंगळवारी सार्वजनिक केलेल्या तीन गोपनीय फायलींपैकी एका फाईलवरून मिळाले आहेत. नेताजींनी या विमान अपघातानंतर तीनदा रेडिओवर भाषण दिल्याचा उल्लेख या फाईलमध्ये आहे. हे तिन्ही रेडिओ प्रसारण विमान अपघात घडल्यानंतरचे आहेत. त्यामुळे नेताजींच्या मृत्यूबाबतचे रहस्य अधिक गडद झाले आहे.फाईल क्रमांक ८७०/११/पी/१६/९२/पीओएलमध्ये या रेडिओवरील प्रसारणांचा तपशील दिलेला आहे, जे नेताजींनी दिल्याचे मानले जाते. बंगालच्या गव्हर्नर हाऊसमधून या प्रसारणांचा मजकूर बाहेर आल्याची शक्यता आहे. ३१-मीटर बँडवरून उचलल्याचा दावा गव्हर्नर हाऊसमधील पी. सी. कार यांनी केल्याचा उल्लेख यात आहे.१ जानेवारी १९४६ रोजीचे दुसरे प्रसारण‘आम्हाला दोन वर्षांच्या आत स्वातंत्र्य मिळणारच आहे. ब्रिटिश साम्राज्यवाद पार कोसळला आहे आणि त्यांना आता भारताला स्वातंत्र्य द्यावेच लागेल. अहिंसेच्या मार्गाने भारत कधीच स्वतंत्र होणार नाही. परंतु मी गांधींचा आदर करतो.’२६ डिसेंबर १९४५ रोजीचे पहिले भाषण ‘हल्ली मी महान जागतिक शक्तींच्या आश्रयाला आहे. माझे हृदय भारतासाठी तळमळत आहे. जेव्हा तिसरे महायुद्ध शिखरावर पोहोचले असेल तेव्हा मी भारतात जाईन. ही संधी दहा वर्षांनंतर किंवा त्याआधीही मिळू शकते. तेव्हा मी त्या लोकांना न्यायाच्या पिंजऱ्यात उभा करेल, जे लाल किल्ल्यावर माझ्या लोकांवर खटला चालवित आहेत.’(हे प्रसारित भाषण नेताजींचेच असल्याचे मानले जाते)फेब्रुवारी १९४६ मधील तिसरे प्रसारण‘जपानने आत्मसमर्पण केल्यानंतर माझ्या भारतीय बंधू-भगिनींना संबोधित करण्याची ही माझी तिसरी वेळ आहे. इंग्लंडचे पंतप्रधान पेथिक लॉरेन्स आणि अन्य दोन सदस्यांना भारतात पाठवित आहेत. त्यांचा उद्देश सर्व मार्गांनी भारताचे रक्त शोषून ब्रिटिश साम्राज्यवादाची कायमस्वरूपी वसाहत निर्माण करण्याशिवाय दुसरा नाही.’