शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

नेताजींचा मृत्यू विमान अपघातातच

By admin | Published: June 01, 2017 1:15 AM

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू १८ आॅगस्ट १९४५ रोजी तैवानमध्ये विमान अपघातामध्येच झाला होता, असे केंद्र सरकारने स्पष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू १८ आॅगस्ट १९४५ रोजी तैवानमध्ये विमान अपघातामध्येच झाला होता, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. सरकारच्या या उत्तरामुळे नेताजींच्या मृत्यूविषयीचे गूढ संपले आहे, असे अनेकांना वाटत असले तरी मात्र बोस कुटुंबियांनी त्यास आक्षेप घेतला आहे. कोणताही स्पष्ट पुरावा नसताना केंद्र नेताजींच्या मृत्यूचे कारण कसे काय जाहीर करू शकते?, असा सवाल सुभाषचंद्रांच्या भावाच्या नातवाने केला आहे.गुमनामी बाबा आणि भगवानजी या नावांचा न्या. मुखर्जी आयोगाच्या अहवालात उल्लेख आहे. मात्र बोस हेच त्या नावाने वावरत होते, हे खरे नसल्याचा निष्कर्ष आयोगाने काढला होता, असेही केंद्रीय गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. नेताजींचा मृत्यू झालाच नव्हता आणि ते गायब झाल्यानंतर गुमनामी बाबा व भगवानजी या नावाने वावरत होते, असे मानणारा एक वर्ग आहे. नेताजींच्या भावाची नात माधुरी बोस यांनी मात्र नेताजी असे अन्य नावाने वावरत होते, ही शक्यता फेटाळून लावली आहे. गृह मंत्रालयानेही शाहनवाझ समिती, खोसला आयोग व मुखर्जी आयोग यांच्या अहवालाच्या आधारे त्यांचा मृत्यू विमान अपघातात झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आल्याचे गृह मंत्रालयाने म्हटले आहे. ओपन प्लॅटफॉर्म फॉर नेताजी या संघटनेच्या सायक सेन यांनी माहितीच्या अधिकाराद्वारे सुभाषचंद्र बोस यांच्यासंबंधीची काही माहिती विचारली होती. त्यांच्या अर्जाच्या उत्तरात गृह मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. मात्र सेन यांनी सरकारच्या माहितीमुळे आपणास धक्का बसल्याचे म्हटले आहे. नेताजींच्या मृत्यूचे कारण शोधण्यात यावे, यासाठी आम्ही झगडत आहोत, विमान अपघाताबाबत निश्चित पुरावा अद्याप सापडलेला नाही. असे असताना कशाच्या आधारे हे उत्तर सरकारने दिले, असा सवाल नेताजींच्या भावाचे नातू व बंगाल भाजपचे उपाध्यक्ष विमान बोस यांनीही केला आहे.मोदींनी दिले होते तपासाचे आश्वासनमी आधी नेताजींचा नातू आहे आणि मग भाजपचा उपाध्यक्ष, असे सांगून विमान बोस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेताजींच्या संबंधीच्या फायली उघड केल्या. त्यावेळी त्यांनी नेताजींविषयीचे गूढ दूर करण्यासाठी त्या प्रकरणाचा तपास करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. नेताजींचा मृत्यू विमान अपघातात झाला नव्हता आणि ते चीन वा रशियाला गेले, असे मुखर्जी आयोगाच्या अहवालात स्पष्टपणे म्हटले होते. मात्र तेव्हाच्या सरकारने तो निष्कर्ष फेटाळून लावला होता. नेताजी बोस यांचा मृत्यू विमान अपघातात झालाच नव्हता, असे काही संशोधकांचेही म्हणणे आहे.