शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

भारतरत्न पुरस्कारावरून नवे वादंग; मोदी सरकारला लक्ष्य करत मायावतींनी केली ही मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2024 17:33 IST

भारतरत्न पुरस्काराबाबत दलित व्यक्तींची उपेक्षा करणं अजिबात योग्य नाही, असं मायावती यांनी म्हटलं आहे.

Mayawati On Bharat Ratna Award ( Marathi News ) : केंद्र सरकारकडून कर्पुरी ठाकूर आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यानंतर आज देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह आणि  पीव्ही नरसिंह राव यांच्यासह ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ डॉ. स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबतची घोषणा करताच देशभरातील विविध राजकीय नेत्यांनी आनंद व्यक्त करत सरकारचे आभार मानले आहेत. मात्र या निवडीनंतर नवं वादंगही निर्माण झालं असून उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी सरकारकडे नवी मागणी केली आहे.

केंद्र सरकारने आणखी तीन व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराची घोषणा करताच मायावती यांनी म्हटलं आहे की, "केंद्रातील विद्यमान भाजप सरकारकडून ज्या व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय, त्याबद्दल मी सरकारचं स्वागत करते. मात्र या पुरस्काराबाबत दलित व्यक्तींची उपेक्षा करणं अजिबात योग्य नाही. सरकारने याकडेही लक्ष द्यायला हवं," अशी मागणी मायावती यांनी केली आहे.

भारतरत्न पुरस्कारावरून सरकारला लक्ष्य करताना मायावती पुढे म्हणाल्या की, " डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मोठ्या प्रतिक्षेनंतर व्ही. पी. सिंह यांच्या सरकारने भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केलं होतं. त्यानंतर दलित आणि उपेक्षितांचे तारणहार श्री कांशीराम यांनी केलेला संघर्षही काही कमी नाही. त्यांनाही लवकरात लवकर भारतरत्न पुरस्कार मिळायला हवा," अशी अपेक्षा मायावती यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, केंद्रातील मोदी सरकारने भारतरत्न पुरस्काराबाबत आधीचे सर्व विक्रम मोडीत काढत गेल्या १५ दिवसांतच तब्बल पाच  व्यक्तींना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला भारतरत्न पुरस्कार जाहीर केला आहे. हा सन्मान मिळवणाऱ्यांमध्ये २ माजी पंतप्रधान, १ माजी उपपंतप्रधान, १ मुख्यमंत्री तसेच प्रसिद्ध कृषीतज्ज्ञांचा समावेश आहे. यातील चौघांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात येत आहे. या पाच नावांची घोषणा स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

टॅग्स :Bharat Ratnaभारतरत्नNarendra Modiनरेंद्र मोदीUttar Pradeshउत्तर प्रदेश