शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
4
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
5
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
6
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
7
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
8
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
9
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
10
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
11
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
12
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
13
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
14
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
15
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
17
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
18
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
19
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
20
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका

अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करून वाहने चोरणारी टोळी सक्रीय चोरीचा नवा ट्रेंड : सॉफ्टवेअर इंजिनियरच्या मदतीने डॉक्टरची कार चोरल्याचा संशय

By admin | Published: July 09, 2016 11:50 PM

जळगाव: अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करुन नव्या कार व अन्य वाहने चोरणारी टोळी उत्तर महाराष्ट्रात सक्रीय झाली आहे. चोरलेल्या वाहनांचे पार्ट वेगळे करून मोठमोठ्या गॅरेजमध्ये त्याची विक्री केली जात असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. गुरुवारी रात्री रिंग रोडवरील डॉ.किशोर कमलसिंग पाटील यांची साडे सात लाखाची कार चोरी झाली, तेथेही हीच पध्दत वापरण्यात आली असून सॉफ्टवेअर इंजिनियरची त्यासाठी मदत घेतली गेल्याचा संशय आहे.

जळगाव: अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करुन नव्या कार व अन्य वाहने चोरणारी टोळी उत्तर महाराष्ट्रात सक्रीय झाली आहे. चोरलेल्या वाहनांचे पार्ट वेगळे करून मोठमोठ्या गॅरेजमध्ये त्याची विक्री केली जात असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. गुरुवारी रात्री रिंग रोडवरील डॉ.किशोर कमलसिंग पाटील यांची साडे सात लाखाची कार चोरी झाली, तेथेही हीच पध्दत वापरण्यात आली असून सॉफ्टवेअर इंजिनियरची त्यासाठी मदत घेतली गेल्याचा संशय आहे.
बनावट किल्लीच्या माध्यमातून कार चोरी होणे शक्यच नसल्याचा दावा कंपनीने डॉक्टरांकडे केला आहे. या कंपनीच्या कारमध्ये इसीएम, इंजिन इन मोबिलायझेशन व अन्य एक अशा तीन यंत्रणा बसविण्यात आल्या आहेत. त्यामुळे बनावट किल्लीमुळे कदाचित कार सुरूही झाली तर शंभर मीटरच्या आत ती कार बंद पडते. स्वीचमध्ये एक चीप असते, ती बनावट किल्ली लगेच ओळखते, अशी माहिती कंपनीच्या अभियंत्यांकडून आपणाला मिळाल्याचे डॉ.पाटील म्हणाले.
तीन दिवस आधी होते रेकी
एखादे वाहन चोरी करायचे असेल तर चोरटे तीन दिवस आधी रेकी करतात. त्यानंतर त्या वाहनाचा नोंदणी व चेचीस क्रमांक मिळवतात. त्यानंतर संगणक, सॉफ्टवेअरचा वापर करून वाहन चोरी केली जाते. या प्रक्रियेत गोपनीय माहिती बाहेर जात असेल तर कंपनीतील एखाद्या व्यक्तीचा कुठेतरी संबंध येत असावा,अशी शंकाही उपस्थित होत आहे.
गॅरेजमध्ये बदलतात गाड्या
चोरी झालेल्या वाहनांचे प्रत्येक पार्ट वेगळे केले जातात. त्यातील इंजिन व चेचीस क्रमांक खोडला जातो. अपघात अथवा अन्य काही कारणाने भंगारात विक्री झालेल्या वाहनांचे आर.सी.बुक गॅरेज चालकांकडे असतेच. त्या वाहनाचा इंजिन व चेचीस क्रमांक जोडून चोरीच्या वाहनांना लावला जातो, शिवाय अधिकृत कागदपत्रे मिळत असल्याने वाहन घेणार्‍यालाही ते वाहन चोरीचे आहे अशी शंका येत नाही.
कंपनीला पत्र देणार
अंतर्गत सिस्टीम्स कमकुवत असल्यानेच कार चोरी झाल्यामुळे त्यात बदल करावा यासाठी कंपनीला पत्र देणार असल्याचे डॉ.किशोर पाटील यांनी सांगितले. सॉफ्टवेअरच्या माध्यमातून वाहन चोरी करण्याची पध्दत अनेक दिवसापासून आहे, मात्र जळगावात ती पहिल्यांदाच आली आहे. धुळे व नाशिक येथेही अशी पध्दत वापरण्यात आली आहे.