शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
5
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
8
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
9
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
10
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
11
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
12
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
13
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
14
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
15
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
16
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
17
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
18
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
19
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
20
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले

#Bestof2017- या वर्षाची नवी ओळख, वेगवान रस्तेबांधणीचं वर्ष 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2017 13:58 IST

२०१७ हे वर्ष भारत आणि जगभरात घडलेल्या सकारात्मक आणि नकारात्मक घटनांमुळे ओळखले जाईल. मात्र भारतातील एका क्षेत्रामध्ये यंदा उल्लेखनीय प्रगती झाली आहे. यावर्षी एप्रिल ते नोव्हेंबर या काळामध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत २३% वाढ झाली आहे. 

ठळक मुद्देया आर्थिक वर्षात ९००० किमी महामार्ग बांधले जातील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने पुरवलेल्या आकडेवारीनुसार या आर्थिक वर्षात नोव्हेंबर अखेरीपर्यंत प्रतिदिन २० किमी अशा सरासरीने ४९४२ किमीचे महामार्ग बांधले गेले

नवी दिल्ली- २०१७ हे वर्ष भारत आणि जगभरात घडलेल्या सकारात्मक आणि नकारात्मक घटनांमुळे ओळखले जाईल. मात्र भारतातील एका क्षेत्रामध्ये यंदा उल्लेखनीय प्रगती झाली आहे. यावर्षी एप्रिल ते नोव्हेंबर या काळामध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत २३% वाढ झाली आहे. महामार्ग आणि गावांना जोडणार्या रस्त्यांचे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासात महत्त्व असते. केंद्र सरकारने यामुळेच महामार्ग बांधण्यावर विशेष लक्ष देण्याचे धोरण अवलंबले आहे. या आर्थिक वर्षात ९००० किमी महामार्ग बांधले जातील असा विश्वास व्यक्त केला जात आहे. मागील आर्थिक वर्षात ८२३१ किमीचे महामार्ग बांधण्यात आले होते. भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने पुरवलेल्या आकडेवारीनुसार या आर्थिक वर्षात नोव्हेंबर अखेरीपर्यंत प्रतिदिन २० किमी अशा सरासरीने ४९४२ किमीचे महामार्ग बांधले गेले तर मागच्या वर्षी याच कालावधीत प्रतिदिन १६.७ किमी गतीने ४०१७ किमी लांबीचे महामार्ग बांधून पूर्ण झाले होते . केंद्र सरकारने 83 हजार किमी लांबीचे महामार्ग बांधण्याची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. त्यासाठी सध्य़ा असलेल्या रस्ते बांधणीच्या गतीमध्ये दुपटीने वाढ करावी लागणार आहे. या महामार्ग बांधणीमुळे रोजगारही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे.भारतमाला प्रकल्पातून महाराष्ट्राला काय मिळणार ? भारतमाला योजनेअंतर्गत देशात ४४ आर्थिक कॉरिडोर उभारण्यात येणार असून त्यातील १२ कॉरिडोर महाराष्ट्रातून जाणार आहेत, अशी माहिती केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. राज्यातील १६ जिल्ह्यांतून हे आर्थिक कॉरिडॉर जातील.ते म्हणाले की, ४४ आर्थिक कॉरिडोरपैकी १२ आर्थिक कॉरिडोर महाराष्ट्रातून जाणार आहेत. त्यात मुंबई-कोलकाता (१,८५४ किमी), मुंबई-कन्याकुमारी (१,६१९किमी), आग्रा-मुंबई (९६४), पुणे-विजयवाडा (९0६ किमी), सुरत-नागपूर (५९३ किमी), सोलापूर-नागपूर (५६३ किमी), इंदूर-नागपूर (४६४ किमी), सोलापूर-बेल्लारी-गुट्टी (४३४ किमी), हैदराबाद-औरंगाबाद (४२७ किमी), नागपूर-मंडी दाबवली (३८७ किमी), सोलापूर-मेहबुबनगर (२९0 किमी) आणि पुणे-औरंगाबाद (२२२ किमी) यांचा समावेश असेल.या सर्व आर्थिक कॉरिडोरची मिळून लांबी ८,५0१ किलोमीटर इतकी आहे. महाराष्ट्रातून जाणाºया या आर्थिक कॉरिडोरमुळे ८ राज्यांशी महाराष्ट्र जोडला जाईल. या १२ आर्थिक कॉरिडोरमध्ये मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, जालना, नागपूर, रत्नागिरी, धुळे, पुणे, सोलापूर, जळगाव, लातूर, नांदेड, यवतमाळ व वर्धा या १६ जिल्ह्यांचा समावेश आहे. वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी देशातील २८ शहरांमध्ये रिंग रोडचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यात राज्यातील पुणे, नागपूर, धुळे या शहरांचा समावेश आहे. देशात २४ मालवाहतूक तळ उभारण्यात येणार असून, त्यात महाराष्ट्रातील मुंबई, मुंबई उपनगर, जेएनपीटी, मुंबई पोर्ट, ठाणे, रायगड, पुणे, नागपूर, नाशिक या ९ ठिकाणांचा समावेश करण्यात आल्याचेही गडकरी यांनी सांगितले.

टॅग्स :Flashback 2017फ्लॅशबॅक 2017Indiaभारतhighwayमहामार्गNitin Gadakriनितिन गडकरीBest of 2017बेस्ट ऑफ 2017