शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

पुढच्या वर्षी IPL विदेशात खेळवण्याचा विचार? बीसीसीआयचा गौप्यस्फोट

By admin | Published: April 21, 2016 6:46 PM

पुढच्या वर्षी आयपीएलचे सामने विदेशात भरवण्यासंदर्भात विचार सुरू असल्याचा गौप्यस्फोट भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे सचिव अनुराग ठाकूर यांनी केला आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 21 - पुढच्या वर्षी आयपीएलचे सामने विदेशात भरवण्यासंदर्भात विचार सुरू असल्याचा गौप्यस्फोट भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे सचिव अनुराग ठाकूर यांनी केला आहे. आधी महाराष्ट्रात आणि नंतर राजस्थानमध्ये दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर होणारा आयपीएलच्या सामन्यांना विरोध बघता या शक्यतेची चाचपणी बीसीसीआय करताना दिसत आहे.
महाराष्ट्रामध्ये दुष्काळ असताना आयपीएलसाठी मैदानांवर बहुमोलाचे पाणी कसे उधळता येऊ शकते, या मताला पाठिंबा दर्शवत कोर्टाने राज्यातले आयपीएल सामने अन्यत्र हलवण्याचा आदेश दिला. मागोमाग, जयपूरमध्येही हे सामने होऊ देऊ नयेत यासाठी राजस्थान उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. एकीकडे दुष्काळी स्थिती आहे, तर दुसरीकडे आयपीएलच्या माध्यमातून मिळणारं कोटी रुपयांचं घबाड आहे.
त्यामुळे दुष्काळ असताना पाण्याचा अपव्यय केला हा आरोपही होणार नाही, आणि विदेशात सामने भरवून आर्थिक रसद सुरू ठेवली जाईल, असा दुहेरी विचार बीसीसीआय करत असल्याचे संकेत यानिमित्ताने मिळाले आहेत.
यासंदर्भात, ठोस काही अद्याप ठरले नसले तरी बीसीसीआय पुढच्या वर्षीचे आयपीएलचे सामने विदेशात भरवण्याची शक्यता आजमावत असल्याचा गौप्यस्फोट ठाकूर यांनी केला आहे.