शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

एनजीओंना वनक्षेत्रात प्रवेश बंदी, हस्तक्षेपाला लगाम

By admin | Published: October 14, 2016 12:59 AM

वन्यजीव आणि वनविभागात सामाजिक संस्था (एनजीओ) म्हणून काम करणाऱ्यांना आता वनक्षेत्रात प्रवेशासाठी वनाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे

उपवनसंरक्षकांचे फर्मान : वनपरिक्षेत्रधिकाऱ्यांना पाठविले पत्रअमरावती : वन्यजीव आणि वनविभागात सामाजिक संस्था (एनजीओ) म्हणून काम करणाऱ्यांना आता वनक्षेत्रात प्रवेशासाठी वनाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. एनजीओंनी विना परवानगीने वनक्षेत्रात प्रवेश केल्याचे आढळल्यास त्यांच्याविरुद्ध वन अधिनियमानुसार कारवाईचे फर्मान उपवनसंरक्षकांनी काढले आहेत. त्यामुळे आता वनविभागात एनजीओंच्या हस्तक्षेपाला लगाम लागणार आहे.वनक्षेत्रात कोणत्याही घडामोडी घडल्या की त्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल होते. या घटनेची सत्यता अथवा वस्तुस्थिती तपासून न पाहता विविध संस्थांचे एनजीओ क्षणात सदर माहिती सार्वत्रिक करत असल्याचे वास्तव पुढे आले आहे. अलीक डे काही जणांनी एनजीओच्या नावाखाली वनक्षेत्रात धुमाकूळ घातल्याचे चित्र आहे. वनक्षेत्रात नागरिकांचा सततचा वावर ही बाब वन्यपशू, वन्यजीवांसाठी धोकादायक ठरणारी आहे. त्यामुळे वनक्षेत्रात वनाधिकारी अथवा वनकर्मचारी यांच्याशिवाय कोणीही परवानगी न घेता प्रवेश केल्याचे दिसून आल्यास अशाविरुद्ध गंभीर स्वरुपाचे वनगुन्हे दाखल करण्याबाबतचे पत्र मुख्य वनसंरक्षक संजीव गौड यांच्या आदेशानुसार उपवनसंरक्षक हेमंत मीना यांनी वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना पाठविले आहे. उपवनसंरक्षकांनी घेतलेल्या या धाडसी निर्णयामुळे कनिष्ठ वनकर्मचाऱ्यांमध्ये धडकी भरली आहे. काही दिवसांपूर्वी पोहरा- वडाळीच्या वनक्षेत्रात अवैध चराई करताना काठेवाडी गुरे जेरबंद करण्यात आले होते. मात्र काठेवाडींनी बळजबरीने काही गुरे वनविभागाच्या ताब्यातून सोडवून नेली आहेत. या घटनेमुळे वनविभागाने वनक्षेत्रात बाहेरील व्यक्तिच्या प्रवेशास मनाई केली आहे. वनक्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वी प्रत्येकांना परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही नियमावली एनजीओंना देखील लागू करण्यात आली आहे. वनक्षेत्रात एनजीओंना कशासाठी प्रवेश करायचा आहे, ही बाब वरिष्ठ वनाधिकाऱ्यांच्या पुढ्यात स्पष्ट करावी लागणार आहे. उपवनसंरक्षकांच्या नव्या फतव्यामुळे वनक्षेत्रातील अनेक नियमबाह्य प्रकाराला आळा बसणार आहे.