शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

खलिस्तानी अन् गँगस्टरवर NIAची कारवाई; पंजाब, हरियाणा, राजस्थानमधील ५० ठिकाणी छापे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 7:52 AM

खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येवरून कॅनडा आणि भारतामध्ये तणाव असताना एनआयएची ही कारवाई होत आहे.

नवी दिल्ली: नॅशनल सिक्युरिटी एजन्सी (NIA) ने गँगस्टर आणि खलिस्तानी यांच्या साखळी संपवण्यासाठी मोठी कारवाई केली आहे. तपास यंत्रणेने पंजाब, हरियाणा, राजस्थान, दिल्ली एनसीआर, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमधील सुमारे ५० ठिकाणी छापे टाकले आहेत. दहशतवादी, गुंड आणि अंमली पदार्थ विक्रेते यांच्यातील संबंध संपवण्यासाठी एनआयए सातत्याने कारवाई करत आहे. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येवरून कॅनडा आणि भारतामध्ये तणाव असताना एनआयएची ही कारवाई होत आहे.

पंजाबमध्ये ३० ठिकाणी एनआयएने छापे टाकले. त्याचवेळी राजस्थानमध्ये १३, हरियाणामध्ये ४, उत्तराखंडमध्ये २, दिल्ली-एनसीआर आणि यूपीमध्ये प्रत्येकी १ ठिकाणी छापे टाकण्यात आले. एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परदेशात बसलेले खलिस्तानी आणि गुंड हवाला चॅनलद्वारे भारतातील ग्राउंड कामगारांना ड्रग्ज आणि शस्त्रे पुरवत आहेत. गुंड-खलिस्तानींची ही फंडिंग साखळी संपवण्यासाठी एनआयएची कारवाई सुरू आहे.

एनआयएच्या तपासात खलिस्तान-आयएसआय आणि गँगस्टरच्या साखळीबद्दल अनेक माहिती जमा झाली आहे. आतापर्यंत अटक करण्यात आलेले गँगस्टर आणि खलिस्तानी यांच्या चौकशीत हे उघड झाले आहे की, गँगस्टर-खलिस्तानी संधानाचा वापर दहशतवादी निधी, शस्त्रास्त्रांचा पुरवठा तसेच परदेशी भूमीतून देशविरोधी कारवाया करण्यासाठी केला जात आहे. एनआयएने आता खलिस्तानी समर्थक आणि परदेशी भूमीतून कार्यरत असलेल्या गँगस्टरवर मोठा हल्ला सुरू केला आहे.

भारत आणि कॅनडामध्ये तणाव वाढला-

एनआयएची ही कारवाई अशा वेळी होत आहे जेव्हा खलिस्तानच्या मुद्द्यावरून भारत आणि कॅनडामध्ये तणाव चांगलाच वाढला आहे. खरे तर खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरची जून महिन्यात कॅनडात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. नुकतेच कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी निज्जरला कॅनडाचे नागरिक म्हणत त्याच्या हत्येत भारतीय दलालांचा हात असल्याचा आरोप केला होता. यानंतर कॅनडानेही भारतीय राजनैतिक अधिकाऱ्याची हकालपट्टी केली. त्याचवेळी भारताने हे आरोप मूर्खपणाचे आणि प्रेरित असल्याचे म्हटले आहे. तसेच, प्रत्युत्तर म्हणून नवी दिल्लीतील कॅनडाच्या अधिकाऱ्याची हकालपट्टी करण्यात आली. याशिवाय भारताने कॅनेडियन लोकांसाठी व्हिसा सेवेवरही बंदी घातली आहे.

अनेक राज्ये त्रस्त

दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थान, जम्मू काश्मीर, पश्चिम उत्तर प्रदेश आणि दिल्ली एनसीआर प्रदेशात त्यांच्या कारवाया सुरू आहेत. दिल्ली पोलिसांनी पकडलेल्या लॉरेन्स बिश्नोई टोळीने पंजाबी गायक मुसेवालाच्या हत्येपासून ते पंजाब आणि कॅनडापर्यंत अनेक हत्या केल्या आहेत. मुंबईत अभिनेता सलमान खानलाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. खलिस्तानी कारवाया, दहशतवादी कारवाया, टेरर फंडिंग आणि गुंडांच्या विरोधात संयुक्त कारवाई केली जाईल. या कारवाईची सूत्रे एनआयएकडे सोपवण्यात आली आहेत. 

टॅग्स :NIAराष्ट्रीय तपास यंत्रणाPunjabपंजाबRajasthanराजस्थान