शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
3
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
4
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
5
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
6
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
7
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
8
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
9
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
10
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
11
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
12
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
13
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
14
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
15
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
16
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
17
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
18
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...
19
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
20
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

Nirbhaya Case : घराला कुलूप लावून पवन जल्लादचे कुटुंबीय बेपत्ता; गायब होण्यामागे आहे एक कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2020 14:44 IST

Nirbhaya Case : फाशीची तयारी रात्री एक वाजता सुरू होत असे. फाशी देण्याआधी दीड तासआधी दोषींच्या डोळ्यांत डोळे घालून पाहण्यास सुरुवात होते.

ठळक मुद्दे गुन्हेगारांच्या डोळ्यात डोळे घालून मी पहिले त्यावेळी मी काय सांगू, किती संकटाला तोंड द्यावे लागले. खरं सांगायाचं झालं तर, यानंतर मला कोणाशीही बोलण्याची इच्छा नाही. शुक्रवारी रात्री पोलिसांनी त्यांच्या वाहनातून पवनला त्याच्या घरी सोडले. शेजार्‍यांशी काहीही न बोलता पवन बंद घरात राहिला.

नवी दिल्ली -  निर्भयाच्या गुन्हेगारांना फाशी देण्याच्या एक दिवस आधी पवन जल्लाद यांच्या घराला कुलूप होते. पवन दिल्लीच्या तिहार तुरूंगात आला होता. त्यामुळे त्याचे कुटुंब शेजार्‍यांना माहिती न देता इतरत्र गेले. घराला दोन दिवस कुलूप होते. शुक्रवारी रात्री पोलिसांनी त्यांच्या वाहनातून पवनला त्याच्या घरी सोडले. शेजार्‍यांशी काहीही न बोलता पवन बंद घरात राहिला. यानंतर सकाळी पुन्हा एकदा घराला कुलूप लावून तो कुठेतरी निघून गेला. पवन जल्लादने आधीच हे सर्व करण्याची तयारी केली होती. हे करण्यामागील एक मोठे कारणही तो सांगतो.

 

Nirbhaya Case : शरीरावरील दातांच्या खुणा होत्या क्रूरतेच्या साक्षीदार ; 10 फोटोंमधून मिळाले पुरावे

 

Nirbhaya Case : निर्भयाचा तो मित्र, एकमेव प्रत्यक्षदर्शी आहे परदेशात

 

Nirbhaya Case : मिळणाऱ्या पैशातून मुलीचे लग्न लावणार; जाणून घ्या पवन जल्लादचा पगारतुरूंगातून आदेश, कोणाशीही बोलू नकापवन जल्लादचे घर मेरठ येथील लोहिया नगर येथे कांशीराम दलित गृहनिर्माण योजनामध्ये आहे. शुक्रवारी सकाळी तिहार कारागृहात निर्भया सामूहिक बलात्कारातील चार गुन्हेगारांना फाशी देऊन पवन रात्री उशिरा घरी परतला. पवनचे शेजारी दिव्यांशू म्हणतात की, पोलिसांची गाडी त्याला घेऊन आली होती. रात्री अकराच्या सुमारास तो घरी आला. पुढे ते असेही म्हणाले की, तीन ते चार दिवस कोणाशीही बोलू नका. घरातच रहा. दोन दिवसांपूर्वी त्याचे कुटुंबही येथून निघून गेले. आज सकाळी पवनचा मुलगा आला. तो पवनसोबत निघून गेला. भगवत पुरा भूमिया पुलाजवळ त्याच्या कुटुंबाचे जुने घर आहे. दिव्यांशु असे सांगतात की, जेव्हा ते आधी तिहार तुरुंगात जात असत, तेथे त्यांना सांगण्यात आले की फाशी दिल्यानंतर तुम्हाला काही दिवस कोणालाही भेटायचे नाही. दिव्यांशु या वसाहतीच्या बाहेर सायबर कॅफे देखील चालवितात. 

बरेच दिवस मनात फाशीचा विचार घोळत असतो तिहार तुरुंगात जाण्यापूर्वी पवन जल्लादने एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले होते की, फाशीची तयारी रात्री एक वाजता सुरू होत असे. फाशी देण्याआधी दीड तासआधी दोषींच्या डोळ्यांत डोळे घालून पाहण्यास सुरुवात होते. मी आजवर फाशी देताना नॉर्मल कोणाला पाहिले नाही. यानंतर, त्यांच्या चेहऱ्यावर काळा कपडा घालणे, दोरीने पाय बांधणे, गळ्यावर फाशीचा दोरखंड घालणे हे सर्व काम करावं लागतं. शेवटी खटका खेचून त्यांना फाशी दिली जाते.पुढे पवन जल्लादाने सांगितले की, ५ तासांचे हे काम डोक्यात आणि मनात चिटकून बसतं की अनेक दिवस फासावर चढवतानाची प्रत्येक वस्तू डोळ्यांसमोर फिरत असते. गुन्हेगारांच्या डोळ्यात डोळे घालून मी पहिले त्यावेळी मी काय सांगू, किती संकटाला तोंड द्यावे लागले. खरं सांगायाचं झालं तर, यानंतर मला कोणाशीही बोलण्याची इच्छा नाही. 

टॅग्स :Nirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेपjailतुरुंगNew Delhiनवी दिल्ली