शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
2
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
3
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
4
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
5
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
6
ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
7
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
8
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
9
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
10
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
11
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
12
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
13
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
14
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
15
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
16
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
17
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
18
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
19
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
20
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास

“तुमचा खूप सन्मान करते, पण ही अपेक्षा नव्हती”; मनमोहन सिंग यांना सीतारामन यांचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 10:31 PM

राष्ट्रीय शेअर बाजारात घडत असलेल्या गोष्टींचा साधा सुगावाही मनमोहन सिंग सरकारला लागला नाही, असा पलटवार निर्मला सीतारामन यांनी केला आहे.

नवी दिल्ली: आताच्या घडील देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांची धूम सुरू आहे. यातच देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांनी विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला. पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भाजपने पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करून मुख्यमंत्री आणि पंजाबच्या जनतेचा अपमान केला आहे, अशी टीका मनमोहन सिंग यांनी केली. याला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मनमोहन सिंग तुमचा मी खूप सन्मान करते. मात्र, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती, असे निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. 

तुम्ही पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की, श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत. तर गरीब आणि गरीब होत चालला आहे. आजची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. कारण सरकारच्या धोरणांमुळे कोरोना काळात महागाई, बेरोजगारी वाढत आहे. मनमोहन सिंग म्हणाले, विद्यमान पंतप्रधान (नरेंद्र मोदी) आपल्या चुका सुधारण्याऐवजी देशाचे पहिले पंतप्रधान नेहरूंना दोषी ठरवत असतात, असे टीकास्त्र मनमोहन सिंग यांनी सोडले. मनमोहन सिंग यांनी पंजाबच्या जनतेसाठी एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे. यामध्ये मोदी सरकारवर निशाणा साधला. याला आता निर्मला सीतारामन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती

निर्मला सीतारामन म्हणाल्या की, त्यांना (मनमोहन सिंग) भारताला सर्वांत कमकुवत बनवल्याबाबत आणि देशातील तीव्र महागाईवरून स्मरण केले जाते. मला तुमच्याबद्दल (मनमोहन) खूप आदर आहे. परंतु, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. यावेळी एनएसईच्या माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण यांनी देशातील सर्वांत मोठे स्टॉक एक्स्चेंज चालवण्यासाठी हिमालयातील योगींचा सल्ला घेतल्याच्या अलीकडील खुलाशांचा निर्मला सीतारामन यांनी उल्लेख केला आणि मनमोहन सिंग यांना सत्तेत असताना या सर्व गोष्टींचा सुगावाही लागला नाही, असा टोला लगावला. सीतारामन यांनी मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी यांच्या काळातील निर्यात आणि थेट विदेशी गुंतवणुकीची आकडेवारीच दिली. 

दरम्यान, केंद्र सरकारने हेदेखील समजून घेतले पाहिजे की, चेहरा बदलल्याने स्थिती बदलत नाही, जे काही खरे आहे ते नेहमीच कोणत्या ना कोणत्या स्वरूपात बाहेर येतेच. मोठमोठ्या गोष्टी बोलणे सोपे असते पण त्या अंमलात आणणे खूप अवघड असते, असे परखड मत मनमोहन सिंग यांनी व्यक्त केले.  

टॅग्स :nirmala sitharamanनिर्मला सीतारामनManmohan Singhमनमोहन सिंगNarendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारण