शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

निठारी हत्याकांड - विशेष सीबीआय कोर्टाने मनिंदर सिंग आणि सुरिंदर कोलीला नवव्या केसमध्ये ठरवलं दोषी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2017 15:01 IST

नोएडाच्या बहुचर्चित निठारी हत्याकांडाच्या नवव्या केसमध्ये विशेष सीबीआय कोर्टाने मनिंदर सिंग आणि सुरिंदर कोली या दोघांना दोषी ठरवलं आहे.

ठळक मुद्देनोएडाच्या बहुचर्चित निठारी हत्याकांडाच्या नवव्या केसमध्ये विशेष सीबीआय कोर्टाने मनिंदर सिंग आणि सुरेंद्र कोली या दोघांना दोषी ठरवलं आहे. सीबीआय कोर्टाकडून 8 डिसेंबर रोजी या दोघांना शिक्षा सुनावली जाऊ शकते.

नवी दिल्ली- नोएडाच्या बहुचर्चित निठारी हत्याकांडाच्या नवव्या केसमध्ये विशेष सीबीआय कोर्टाने मनिंदर सिंग आणि सुरिंदर कोलीला या दोघांना दोषी ठरवलं आहे. या प्रकरणावरील शेवटची सुनावणी बुधवारी झाली होती. सीबीआय कोर्टाकडून 8 डिसेंबर रोजी या दोघांना शिक्षा सुनावली जाऊ शकते. सीबीआय कोर्टाने या दोघांना कलम 302, कलम 376 आणि कलमत 364 अंतर्गत दोषी ठरवलं आहे. 

 

याआधी बुधवारी अंतिम सुनावणीसाठी गाझियाबादच्या डासना तुरूंगात शिक्षा भोगत असणारा सुरिंदर कोलीला सीबीआयचे विशेष न्यायाधीस पवन कुमार तिवारी यांच्या समोर हजर करण्यात आलं होतं. निठारी हत्याकांडात मनिंदर सिंग आणि  सुरिंदर कोली या दोघांवर एकुण 16 केसेस सुरू आहेत. यापैकी 8 केसेसवर सीबीआयच्या विशेष कोर्टाने निर्णय दिलेला आहे. 

काय आहे निठारी हत्याकांड ?20 जून 2005 रोजी नोएडाच्या निठारी भागातून एक आठ वर्षाची मुलगी अचानक गायब झाली. या घटनेनंतर निठारी भागातून एकामागे एक अशी लहान मुलं गयाब व्हायला लागली. मुलं गायब होण्याची ही घटना एक वर्षभर सुरू होती. वर्षभरात जवळपास बारा लहान मुलं गायब झाली. यानंतर पोलिसांनी एक मोठ सर्च ऑपरेशन सुरू केलं. 

7 मे 2006 रोजी एक 21 वर्षीय मुलगी निठारी भागातून गायब झाली. त्यावेळी त्या मुलीच्या मोबाईलमधून पोलिसांना महत्त्वाचा सुगावा लागला.मुलीच्या मोबाइलमधील कॉल डिटेल्सची पोलिसांनी तपासणी केली. या तपासणीमध्ये मनिंदर सिंगचं नाव समोर आलं होतं. यानंतर पोलीस तपासात पूर्ण निठारी प्रकरणाचा खुलासा झाला. ज्यामध्ये 15 पेक्षा जास्त लहान मुली आणि तरूणींवर बलात्कार करण्यात आला. बलात्कारानंतर त्यांची हत्या करून त्यांचे मृतदेह मनिंदरने घरात गाडले होते. 29 डिसेंबर 2006 रोजी पोलिसांना मनिंदरच्या नोएडातील घरात 19 मानवी सांगाडे सापडले होते. 

निठारी हत्याकांडाच्या सहा केसेसमध्ये कोर्टाने सुरिंदर कोलीला दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात कोर्टाने कोलीला एका मुलीच्या हत्येप्रकरणात तसंच अपहरण, बलात्कार आणि पुरावे मिटविण्याच्या आरोपात दोषी ठरवलं. त्याआधी पाच केसेसमध्ये सीबीआय कोर्टाने कोलीला दोषी ठरवत फाशीची शिक्षा दिली आहे. दरम्यान, 2015मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्याची फाशीची शिक्षा जन्मठेपेत रूपांतरित केली होती. 

टॅग्स :Nithari killingsनिठारी हत्याकांडCrimeगुन्हाCourtन्यायालय