शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Nitin Gadkari on Electric Bus : "इलेक्ट्रिक बसच्या प्रवाशांचे तिकीट 30 टक्के स्वस्त होऊ शकते", नितीन गडकरींची घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 20:02 IST

Nitin Gadkari on Electric Bus : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी इंदूर येथे एका कार्यक्रमादरम्यान सांगितले की, देशभरातील राज्यांच्या रस्ते वाहतूक महामंडळे कधीही नफ्यात येऊ शकत नाहीत, कारण बसेस महागड्या डिझेलवर चालत आहेत.

इंदूर : देशातील सार्वजनिक वाहतूक पायाभूत सुविधांमध्ये डिझेल इंधनाचा वापर कमी करण्यावर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी भर दिला आहे. ते म्हणाले की, डिझेल बसच्या तुलनेत इलेक्ट्रिक बसच्या प्रवाशांचे तिकीट 30 टक्के स्वस्त होऊ शकते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी इंदूर येथे एका कार्यक्रमादरम्यान सांगितले की, देशभरातील राज्यांच्या रस्ते वाहतूक महामंडळे कधीही नफ्यात येऊ शकत नाहीत, कारण बसेस महागड्या डिझेलवर चालत आहेत. ते म्हणाले, "मी पूर्ण जबाबदारीने बोलत आहे की इलेक्ट्रिक वातानुकूलित बसच्या प्रवाशांचे तिकीट डिझेलवर चालणाऱ्या बसपेक्षा 30 टक्क्यांपर्यंत स्वस्त होऊ शकते. केंद्र सरकार देशभरात 50,000 इलेक्ट्रिक बस चालवण्याच्या योजनेवर पुढे जात आहे."

नितीन गडकरी म्हणाले, "देशाची वाहतूक व्यवस्था दूरदृष्टीने बदलण्याची गरज आहे. पेट्रोल आणि डिझेलऐवजी वाहनांमध्ये वीज, ग्रीन हायड्रोजन, इथेनॉल, बायो-सीएनजी आणि बायो-एलएनजी यांसारख्या स्वस्त इंधनांच्या वापराला अधिकाधिक प्रोत्साहन दिले पाहिजे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातील बांधकामांवर होणारा खर्च कमी करणे अत्यंत गरजेचे आहे, मात्र संपूर्ण सरकारी यंत्रणेला त्याची सवय नाही."

याचबरोबर, "राजकारण्यांनी 50 वर्षे पुढचा विचार केला पाहिजे कारण अनेक सरकारी अधिकारी केवळ पॅच वर्क (समस्या त्वरित सोडवण्यासाठी) करतात. ते फक्त आजच्या कामाचा विचार करतात, कारण येत्या काळात त्यांची बदली होईल असे वाटते", असेही नितीन गडकरी म्हणाले. दरम्यान, या कार्यक्रमादरम्यान नितीन गडकरींनी मध्य प्रदेशात 2,300 कोटी रुपयांच्या पाच रस्ते प्रकल्पांची पायाभरणी केली. अधिकार्‍यांच्या मते, या प्रकल्पांमुळे मध्य प्रदेशची महाराष्ट्र आणि दक्षिणेकडील राज्यांशी संपर्क सुधारेल आणि रोजगार आणि गुंतवणुकीच्या संधीही वाढतील.

20 उड्डाणपूल बांधण्यास मंजुरीमुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या मागणीनुसार इंदूर, भोपाळ, सागर, ग्वाल्हेर, जबलपूर, रतलाम, खंडवा, धार, छतरपूर आणि विदिशा येथे 20 उड्डाणपूल बांधण्यास मंजुरी दिल्याची घोषणा नितीन गडकरी यांनी केली. नितीन गडकरी म्हणाले की, 2014 सालापासून आतापर्यंत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मध्य प्रदेशसाठी 2.5 लाख कोटी रुपयांचे प्रकल्प मंजूर केले आहेत आणि 2024 च्या अखेरीस हा आकडा 4 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढेल. 

यापूर्वी नितीन गडकरी म्हणाले होते की, पुढील 1 वर्षात इलेक्ट्रिक वाहनांची किंमत पेट्रोल वाहनांच्या बरोबरीने असेल. ही बातमी कार आणि दुचाकीस्वारांना दिलासा देणारी आहे. दरम्यान, नितीन गडकरी म्हणाले की, तंत्रज्ञान आणि ग्रीन फ्युएलमध्ये झपाट्याने होणारी प्रगती यामुळे इलेक्ट्रिक ऑटोमोबाईल्सची किंमत कमी होईल. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीMadhya Pradeshमध्य प्रदेशelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरAutomobileवाहन