शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध दुसरा सामना आजपासून; खेळपट्टी ठरवणार कसोटी मालिकेचे भवितव्य
2
आजचे राशीभविष्य : प्रवास किंवा सहलीची शक्यता, आज काही आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता
3
राज'पुत्रा'समोर दोन्ही सेनेचे आव्हान; अमित ठाकरेंची माहीममधील लढत रंगतदार होणार!
4
फॉर्म्युल्यात ८५चे समान 'चित्र'! प्रत्यक्षात काँग्रेस १०३, उद्धवसेना ९४, शरद पवार गट ८४!
5
धनत्रयोदशीला धनवर्षाव: ९ राजयोग, ९ राशींवर लक्ष्मी प्रसन्न; ऐश्वर्य, वैभवाचे वरदान, शुभ-लाभ!
6
"प्रथमच स्वतःसाठी मागतेय मते"; प्रियांका गांधी यांनी वायनाड मधून भरला उमेदवारी अर्ज
7
गुरुपुष्य योग: स्वामी महाराजांच्या पूजेनंतर आवर्जून म्हणा प्रदक्षिणा अन् आरती गुरुवारची
8
ताशी १२० किमीने धडकणार 'दाना' चक्रीवादळ; पावसाला सुरुवात, ३५० रेल्वे रद्द
9
विधानसभा निवडणूक: ठाण्यातील चार विधानसभा मतदारसंघांत 'काँटे की टक्कर'ची शक्यता
10
परस्परांविरोधात प्रचार करणार? संदीप नाईक यांच्या उमेदवारीमुळे गणेश नाईकांपुढे पेच
11
ठाणे मतदारसंघात शिंदेसेनेची भाजपच्या विरोधात बंडखोरी; पाचपाखाडी मतदारसंघावर दावा
12
हाती 'धनुष्यबाण', कुडाळमधून विजयाचा निर्धार; शिवसेना प्रवेशानंतर निलेश राणे भावूक
13
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
14
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
15
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
16
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
17
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
18
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
19
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
20
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?

देशात लवकरच फ्लेक्स फ्युएल कार लाँच होणार; नितीन गडकरी म्हणाले, "100 टक्के इथेनॉलवर चालतील वाहने"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 8:50 AM

"ऑगस्टपासून इथेनॉलवर १०० टक्के चालणारी वाहने बाजारात लाँच केली जातील. बजाज, टीव्हीएस आणि हिरो कंपन्यांनी १०० टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या मोटारसायकल बनवल्या आहेत," असे नितीन गडकरी म्हणाले.

नवी दिल्ली : ऑगस्टमध्ये देशात १०० टक्के इथेनॉलवर चालणारी वाहने बाजारात आणली जातील, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. "ऑगस्टपासून इथेनॉलवर १०० टक्के चालणारी वाहने बाजारात लाँच केली जातील. बजाज, टीव्हीएस आणि हिरो कंपन्यांनी १०० टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या मोटारसायकल बनवल्या आहेत," असे नितीन गडकरी म्हणाले.

टोयोटा कंपनीप्रमाणे ६० टक्के इथेनॉल आणि ४० टक्के इलेक्ट्रिक वाहनेही बाजारात आणणार असल्याचे त्यांनी सांगितले. टोयोटा कंपनीची कॅमरी कार ६० टक्के पेट्रोल आणि ४० टक्के विजेवर चालते आणि या कंपनीच्या माध्यमातून आम्ही अशी आणखी वाहने बाजारात आणणार आहोत, जी ६० टक्के इथेनॉल आणि ६० टक्के विजेवर चालतील. ही देशात एकप्रकारे क्रांतीसारखी असतील, असे नितीन गडकरी म्हणाले.

"प्रत्येकाचे कामे पूर्ण होतील याची मी खात्री करतो. राजकारणाच्या पलीकडे जाऊन मी हे नेहमीच केले आहे. भाजपने आम्हाला सर्वांना न्याय देण्यास शिकवले आहे आणि ते आम्हाला मजबूत बनवते. मी भाजपचा कार्यकर्ता आहे, पण सरकार देशातील जनतेचे आहे. त्यामुळे 'सबका साथ, सबका विश्वास, सबका प्रयास', असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत," असे नितीन गडकरी यांनी सांगितले.

याचबरोबर, सर्व राज्यात मी राजकारणापासून दूर राहून रस्ते विकासाचे काम केले आहे. भाजपचे सरकार नसलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री विकास प्रकल्पांवर चर्चा करण्यासाठी मला भेटायला येतात. अलीकडच्या काळात पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी मला भेटायला आल्या आणि त्यांनी अनेक प्रकल्पांवर चर्चा केली, असे नितीन गडकरी म्हणाले.

"जनतेची सेवा करणे हे पहिले कर्तव्य"नितीन गडकरी म्हणाले की, "देशातील रस्ते अनेक राज्यांतून जातात. त्याठिकाणी काँग्रेस किंवा भाजपची सत्ता असू शकते. मात्र, याचा अर्थ काँग्रेसशासित राज्यांमध्ये विकासकामे थांबवावीत, असा अजिबात नाही. देशात जे काही रस्ते बांधले जातात ते येथील लोकांसाठी आहेत. मी भाजपचा कार्यकर्ता आहे, पण पहिल्यांदा मी भारत सरकारचा मंत्री आहे आणि माझी पहिली जबाबदारी आणि कर्तव्य हे देशातील जनतेची सेवा आहे."

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीAutomobileवाहन