शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

नितीशकुमार पुन्हा एकदा भाजपाबरोबर जाण्याच्या विचारात?; राजकीय भूकंप होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2023 8:22 AM

भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशात इतर मित्रपक्षांना बरोबर घेऊन काम करावे लागेल, याची भाजप नेतृत्वाला जाणीव झाली आहे.

- हरीश गुप्तानवी दिल्ली : महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसमधील खळबळजनक घडामोडीनंतर विरोधी पक्षांमध्ये प्रचंड गोंधळ आणि गदारोळाचे वातावरण पाहायला मिळत आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार पुन्हा एकदा भाजपबरोबर जाण्याच्या विचारात असल्याचे वृत्त पाटण्यातून येत आहे. राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी नितीशकुमार यांची भेट घेतल्यामुळे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संदेशवाहक म्हणून काम करू शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे.

भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशात इतर मित्रपक्षांना बरोबर घेऊन काम करावे लागेल, याची भाजप नेतृत्वाला जाणीव झाली आहे. याचमुळे दुरावलेला भागीदार अकाली दलाला एनडीए आणि केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी करून घेण्यावर फेरविचार झाला असावा. भाजपने अकाली दलाचे अध्यक्ष व लोकसभा खासदार सुखबीर सिंह बादल यांनाच त्यांच्या पत्नी हरसिमरत कौर यांच्याऐवजी मंत्रिमंडळात सहभागी होण्यास सांगितले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप नेतृत्वाने कर्नाटकात जनता दल (एस)बरोबर युती करण्याचे ठरवले आहे.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांना आता राज्यपाल म्हणून पाठवले जाऊ शकते, असे संकेत आहेत. कारण त्यांच्या पत्नी ज्या काँग्रेसच्या विद्यमान खासदार आहेत त्या नंतर भाजपमध्ये प्रवेश करून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवू शकतात. दरम्यान, वायएसआर काँग्रेसचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी बुधवारी पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतली. ते एनडीएमध्ये सामील होऊ शकतात; परंतु विधानसभा निवडणुकीनंतरच. इतर पाच राज्यांसह नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये लवकर विधानसभा निवडणुका घेण्यासाठी ते इच्छुक आहेत. विधानसभा जिंकल्यानंतर ते लोकसभा निवडणुकीसाठी एनडीएमध्ये सामील होऊ शकतात. त्यांना आंध्र प्रदेशात भाजप- टीडीपी युती रोखायची आहे. कारण त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर आणि पक्षाच्या सदस्यांविरुद्ध सीबीआय आणि ईडीचे १७ खटले आहेत.

  • सुखबीर सिंह बादल यांना कॅबिनेट पदाची ऑफर
  • अमरिंदर सिंह यांना राज्यपाल करणार?
  • जगन रेड्डी यांना आंध्रात हव्यात लवकर निवडणुका
  • हरिवंश यांनी नितीशकुमार यांची भेट घेतल्याने बिहारमध्ये खळबळ
टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी