शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
2
मराठा तितुका मेळवावा नाही, ओबीसी संपावावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
3
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
4
राजीनाम्यानंतर शिवदीप लांडे हे प्रशांत किशोर यांच्या पक्षामधून राजकारणात उतरणार? दिलं असं उत्तर  
5
मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल
6
LLC 2024 : दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात! शिखर धवन-रैनाचे संघ भिडणार; जाणून घ्या सर्वकाही
7
महायुतीची कटकट वाढणार, गोपीचंद पडळकरही सरकारविरोधात उतरणार रस्त्यावर! मोठी घोषणा
8
HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?
9
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
10
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!
11
कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?
12
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
13
हात पाय बांधून मारहाण, बलात्काराची धमकी आणि..., लष्करी अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात घडला धक्कादायक प्रकार  
14
चापून चोपून साडी नेसवून लिपस्टीक लावली! अभिजीतचा भन्नाट लूक पाहून निक्की म्हणाली- "बाsssई"
15
५० सेकंदांची फी ५ कोटी, प्रायव्हेट जेटने प्रवास; 'ही' अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण
16
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?
17
अमित शाहांकडून महिला शेतकऱ्यांना गिफ्ट, उत्पन्न वाढवण्यासाठी सुरु केला 'हा' उपक्रम
18
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
19
दलजीत कौरला पतीच्या गर्लफ्रेंडनेच दिली धमकी, अभिनेत्रीनेही दिलं जशास तसं उत्तर; नेमकं काय घडलं?
20
Bigg Boss Marathi 5: "२ हजारांचा सेकंड हँड मोबाईल घेतला, डिस्प्ले गेलेला"; सूरजने सांगितला पहिल्या फोनचा किस्सा

नितीश कुमारांचे सरकार आणि श्रावण मास... तुम्हाला माहिती आहे का 'हे' खास कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2023 9:17 AM

Nitish Kumar, Bihar: नितीश कुमारांचे राजकारण अनेकांना समजण्यापलीकडले आहे.

Nitish Kumar, Bihar Politics: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच आता सर्वांच्या नजरा बिहारकडे लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर बिहारमध्येहीराजकारण रंगले असावे, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, आतापर्यंत सत्ताधारी पक्ष जेडीयूकडून यासाठी स्पष्ट नकार दिला जात आहे. नितीश कुमार यांचा पक्ष पहिल्या दिवसापासून म्हणत आहे की बिहारमध्ये कोणताही राजकीय खेळी होणार नाही. पण या दरम्यान आता काही अशा गोष्टी घडताना दिसल्या आहेत की त्यामुळे राजकीय घटनाक्रम बरंच काही सांगून जातो आणि त्यावरूनच बिहारचे महाआघाडीचे सरकार स्वत: नितीश कुमारच पुन्हा पाडू शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे.

नितीशकुमारांनी सरकार बनवले आणि पाडले!

नितीशकुमारांचे राजकारण समजून घेणे अवघडच नाही तर अशक्य आहे. नितीशकुमार सायलेंट मोडमध्ये गेले तर ते समजण्यास अधिकच कठीण होतात. नितीशकुमार सध्याच्या राजकारणात पूर्णपणे सक्रिय असले तरी त्यांच्या पक्षाचे नेतेही सातत्याने वक्तव्ये करत आहेत. पण त्यामागील राजकारण आधी समजून घ्यावे लागेल. राजकीय पंडित सांगतात की नितीशकुमार यांची स्वतःची एक विचारपद्धती आहे. त्याच घटनाक्रमाने नितीशकुमार स्वत: सरकार बनवतात आणि नंतर पाडतात.

श्रावण महिन्याशी नितीश कुमारांचा संबंध काय? 

बिहारमध्ये सध्या 2017 सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. लालू-राबडींसोबतच सीबीआयने तेजस्वी यादव यांनाही 'लँड फॉर जॉब्स' प्रकरणात आरोपी बनवले आहे. तेव्हापासून बिहारमधील सरकारची स्थिती डळमळीत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. बिहारमध्ये कधीही काहीही होऊ शकते. या गोष्टींचा संबंध श्रावण महिन्याशी जोडला जात आहे. नितीशकुमार श्रावणातच सरकार बनवतात आणि पाडतातही. 2017 असो वा 2022, श्रावण महिन्यातच नितीशकुमार यांनी राजकीय सत्ताबदल करून सरकार पाडले आणि नंतर पुन्हा नवे सरकार श्रावणातच स्थापन केले.

नितीशकुमारांची विचारपद्धती समजून घ्यायची म्हटल्यास, नितीश कुमार यांनी काही दिवसांपूर्वी राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची राजभवनात भेट घेतली होती. त्याच दिवशी भाजप नेते सुशील मोदी यांनीही राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर नितीशकुमार यांनी आपल्या आमदार आणि खासदारांची वन-टू-वन भेट घेतली. यादरम्यान त्यांनी राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांचीही भेट घेतली. दोन्ही नेते कधी भेटले याबद्दल कुणालाही नीट माहिती नाही. हरिवंश नारायण सिंह यांनी पाटणा सोडले तेव्हा मीडियाला यासंबंधी थोडी माहिती मिळाली. पण या दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली, याची माहिती अद्याप मिळालेली नाही.

दुसरीकडे, नितीश कुमार ज्या आमदार-खासदारांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भेटायचे आणि ते बाहेर आल्यावर तेच बोलायचे की नितीशकुमार यांनी फीडबॅक घेण्यासाठी बोलावले होते. आता प्रश्न असा पडतो की, अचानक नितीश कुमार आपल्या आमदार-खासदारांकडून फीडबॅक का घेऊ लागले आहेत? नितीश कुमारांच्या मनात काय चालले आहे? हे असे प्रश्न आहेत. त्यामुळे राजकीय उलथापालथ होणार की काय, असे बोलले जात आहे.

टॅग्स :BiharबिहारNitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाPoliticsराजकारण