शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

नितीश कुमारांनी भाजपा सरकारचा पाठिंबा काढला; मणिपूरच्या राज्यपालांना दिलं पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 16:36 IST

जेडीयूनं भाजपा सरकारचा पाठिंबा काढल्याने तिथल्या सरकारला धोका नाही परंतु या निर्णयाचे दूरगामी परिणाम पाहायला मिळू शकतात.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील जनता दल (यूनाइटेड) ने बुधवारी मणिपूर सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. मणिपूरमध्ये मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांच्या नेतृत्वात भाजपा सरकार आहे. जेडीयूने अधिकृतपणे मणिपूर सरकारचा पाठिंबा काढत असल्याची घोषणा केली आहे. २०२२ पासून जेडीयू आणि भाजपाची युती होती परंतु आता सत्ताधारी भाजपासून दूर जाण्याचा निर्णय नितीश कुमारांच्या जेडीयूने घेतला आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

जेडीयूच्या ६ पैकी ५ आमदारांनी भाजपाला पाठिंबा दिल्यानं मणिपूरमध्ये भाजपा सरकारचं संख्याबळ वाढलं होते. मात्र जेडीयूने आता घेतलेल्या निर्णयाचा मणिपूरमध्ये बीरेन सिंह यांच्या नेतृत्वातील भाजपा सरकारवर काही परिणाम होणार नाही. राज्यात भाजपाचं बहुमत आहे त्यामुळे कुठल्याही पाठिंब्याशिवाय ते सत्ता टिकवू शकतात. ६० संख्याबळ असणाऱ्या मणिपूर विधानसभेत भाजपाकडे बहुमतापेक्षा अधिक जागा आहेत. विद्यमान सभागृहात त्यांचे ३२ आमदार आहेत. ६ आमदार जेडीयूचे निवडून आले होते. मात्र आता त्यांनी भाजपा सरकारपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.

मागील २ वर्षापासून मणिपूर येथील परिस्थितीमुळे भाजपा सरकारच्या कार्यशेलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे. मणिपूरात एनपीएफकडे ५ जागा, एनपीपीकडे ७ सदस्य आहेत. याठिकाणी काँग्रेसचे ५ आमदार आहेत तर केपीएकडे २ आमदार आहेत. जेडीयूनं भाजपा सरकारचा पाठिंबा काढल्याने तिथल्या सरकारला धोका नाही परंतु या निर्णयाचे दूरगामी परिणाम पाहायला मिळू शकतात. विशेष म्हणजे दिल्ली ते पटनापर्यंत या निर्णयाचे विविध तर्कवितर्क लढवले जातील. 

बिहारमध्ये याचवर्षी ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. अशावेळी नितीश कुमार यांच्या पक्षाने घेतलेला निर्णय भाजपावर दबावाचं तंत्र वापरण्यासाठी घेतला गेला का अशीही चर्चा आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये नितीश कुमारांच्या जेडीयूचे ५ आमदार भाजपात सहभागी झाले होते. त्याआधी अरुणाचल प्रदेशातही जेडीयूचा एकमेव आमदार भाजपात गेला होता. मणिपूरमध्ये जेडीयूकडे एकमेव आमदार राहिला होता तोदेखील आता विरोधी बाकांवर बसणार आहे. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाManipur Assembly Election 2022मणिपूर विधानसभा निवडणूक २०२२