शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

नितीशकुमार आज मोठा निर्णय घेण्याची शक्यता

By admin | Published: July 16, 2017 8:54 AM

नितीशकुमार यांनी आज रविवारी आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत एखादा मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

ऑनलाइन लोकमतबिहार, दि. 16 - राज्यात सत्ताधारी आघाडीतल्या राष्ट्रीय जनता दल आणि जनता दलातील (संयुक्त) या दोन्ही पक्षांमधील वाद विकोपाला गेला आहे. जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त सरकारने पाटण्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमाला बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव उपस्थित न राहिल्यामुळे आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. संयुक्त जनता दलाने राष्ट्रीय जनता दलाला दिलेली चार दिवसांची मुदत संपली आहे, तरीसुद्धा तेजस्वी यादव यांनी अद्यापही राजीनामा दिलेला नाही आणि त्यांनी राजीनामा देण्याची गरजच नाही, असे राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी जाहीरच केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर नितीशकुमार यांनी आज रविवारी आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत एखादा मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. या बैठकीत तेजस्वी यांना बरखास्त करण्याचा निर्णय झाला तर नितीश सरकार पडेल आणि नवी राजकीय समीकरणे सुरू होतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. राष्ट्रीय जनता दलानं सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यास केवळ भाजपाचे 58 आमदार जनता दलाच्या सरकारला तारू शकतात. मात्र, भाजपाच्या जवळ गेल्यास हक्काची मतं गमावण्याची भीती जनता दलाला सतावते आहे. 2010च्या बिहार विधानसभा निवडणुकीत जनता दल युनायटेडनं 141 जागा लढवून 115 उमेदवार जिंकून आणले होते. मात्र 2013मध्ये मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर नितीशकुमार एनडीएमधून बाहेर पडले होते. राष्ट्रीय जनता दलानं 2010मध्ये स्वतंत्र निवडणूक लढवून केवळ 22 जागा जिंकल्या होत्या. तेजस्वींवर तुरुंगात जाण्याची वेळ आल्यास आघाडी तोडण्यासाठी लालू पुढाकार घेणार नाहीत. भाजपला दूर ठेवण्यासाठी बाहेरून पाठिंबा देतील.

सध्या दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आरजेडीने आपल्या 80 आमदारांचा धाक दाखवण्याऐवजी तेजस्वी यादव यांच्यावर लागलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत स्पष्टीकरण द्यावे, असा टोला जेडीयूने लगावला होता. राष्ट्रीय जनता दलाचे बिहार अध्यक्ष रामचंद्र पूर्वे यांनी आपल्या पक्षाकडे 80 आमदारांचे बळ असल्याचे वक्तव्य केले होते. आणखी वाचा

जेडीयूचे बिहारमधील मुख्य प्रवक्ते संजय सिंह म्हणाले होते की, आरजेडीने आपल्या 80 आमदारांचा गर्व बाळगू नये. त्यांनी 2010मधील आपली 22 आमदारांची संख्या लक्षात ठेवली पाहिजे. 2015 साली आरजेडीच्या वाढलेल्या आमदारांच्या संख्येमध्ये नितीश कुमार यांच्या विश्वासार्ह चेहऱ्याचा मोठा हात होता हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याविरोधाल रेल्वेच्या हॉटेल घोटाळ्याप्रकरणी आरोप झाले असून, त्यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. सध्या 243 सदस्य असलेल्या बिहार विधानसभेत राष्ट्रीय जनता दलाचे 80, संयुक्त जनता दलाचे 71, काँग्रेसचे 27 आणि भाजपाचे 53 आमदार आहेत.