शहरं
Join us  
Trending Stories
1
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
2
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
3
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
4
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
5
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
6
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
7
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?
8
योगींसह 'या' नेत्यांच्या सुरक्षेतून NSG चे ब्लॅक कॅट कमांडो हटवणार, सरकारने आखली नवीन योजना
9
भारत जगाचे नेतृत्व करणार; 6G बाबत सरकारची मोठी घोषणा, Jio-Airtel-BSNL-Vi ग्राहकांना...
10
रशिया-युक्रेन युद्धाचा भारताला मोठा फटका! ३ अब्ज डॉलर्सच्या करारवर सही झाली, पण...
11
ओमर अब्दुल्लांच्या सरकारपासून काँग्रेस चार हात लांब; महाराष्ट्र निवडणुकीशी कनेक्शन?
12
"उद्धव ठाकरे आजारी पडल्याचं टायमिंग साधून निवडणुकीची घोषणा, त्यामागे षडयंत्र तर नाही ना?’’ ठाकरे गटाला शंका
13
T20 WC 24 : आम्ही कमी पडलो, तुमचं प्रेम, टीका यासाठी आभार; श्रेयांका पाटीलची प्रामाणिक कबुली
14
गायत्री शिंगणेंची बंडाची तयारी! शरद पवारांनी उमेदवारी दिली नाही, तर...
15
लढायचं की पाडायचं? मनोज जरांगेंनी २० तारखेला बोलावली अंतिम बैठक
16
Maharashtra Assembly Election 2024 : 'एक महिन्यापासून अजितदादांसोबत बोललो नाही'; राजेंद्र शिंगणे मोठा निर्णय घेणार? दिले स्पष्ट संकेत
17
ICC कडून डिव्हिलियर्सला 'हॉल ऑफ फेम'; विराटचे मित्रासाठी लांबलचक पत्र, आठवणी अन्...
18
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर अरबाज खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "कुटुंबात खूप काही..."
19
"...तर समाजवादी पार्टी स्वबळावर निवडणूक लढवणार", अबू आझमींचा महाविकास आघाडीला इशारा
20
गुजरातमध्ये केमिकल फॅक्टरीमध्ये मोठा अपघात! विषारी वायूमुळे पाच कामगारांचा मृत्यू

विरोधकांच्या पत्रकार परिषदेतून नितीश कुमार गायब; नाराजीमुळे ते निघून आले, भाजपाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 9:27 AM

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा मुकाबला करण्यासाठी विरोधी पक्ष एकजूट होण्याचा प्रयत्न करत आहे.

पटणा – बंगळुरूत झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत नाराज झालेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार तिथून लवकर निघून आले. नितीश कुमार यांना नव्या INDIA आघाडीचे संयोजक न बनवल्याने नाराज आहेत. त्यामुळेच ते बंगळुरूच्या बैठकीतून लवकर बाहेर पडले असा दावा भाजपाचे राज्यसभा खासदार सुशील कुमार मोदी यांनी केला आहे.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा मुकाबला करण्यासाठी विरोधी पक्ष एकजूट होण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठीच बंगळुरूत दोन दिवसीय विरोधी पक्षाच्या महाबैठकीचे आयोजन काँग्रेसकडून करण्यात आले. १७-१८ जुलैला ही बैठक बंगळुरूत पार पडली. त्यात काँग्रेससह अनेक विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली. या बैठकीत २६ पक्षाचे नेते सहभागी झाले होते. इतकेच नाही तर २०२४ च्या निवडणुकीसाठी विरोधकांच्या या आघाडीला INDIA म्हणजे इंडियन नॅशनल डेव्हलेपमेंट इंक्लूसिव्ह अलायन्स असं नाव देण्यात आले आहे.

पत्रकार परिषदेतून नितीश कुमार गायब

 बंगळुरूत झालेल्या बैठकीनंतर विरोधकांची एकत्रित पत्रकार परिषद झाली. त्यात नितीश कुमार गायब होते. बैठकीतून निघून ते पटणासाठी रवाना झाले. नितीश कुमार नाराज होऊन बैठकीतून निघाले त्यामुळे पत्रकार परिषदेला थांबले नाहीत असा दावा भाजपाने केला आहे. या पत्रकार परिषदेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, उद्धव ठाकरे, राहुल गांधी यांनी त्यांची मते मांडली.

भाजपा खासदार सुशील कुमार मोदी ट्विट करून म्हटलं की, नितीश आणि लालू प्रसाद यादव विरोधकांच्या पत्रकार परिषदेत न थांबता का निघून आले? INDIA चे संयोजक न बनवल्याने ते नाराज तर नाहीत ना...तर बिहारच्या महाआघाडीतील मोठे नेते बंगळुरूतून निघून आले असं केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांनी ट्विटरमधून सांगितले. विरोधी पक्षाच्या बैठकीआधी बंगळुरूत नितीश कुमार यांच्याविरोधात पोस्टरबाजी झाली. त्यात बिहारमध्ये कोसळलेल्या ब्रीजचा उल्लेख होता. नितीश कुमार हे अनस्टेबल प्राइमिनिस्ट्रियल कंटेडर असल्याचे पोस्टरमध्ये लिहिलं.

दरम्यान, महाबैठकीत नेत्यांनी नितीश कुमार यांना बंगळुरू बोलावून त्याचा अपमान केला. काँग्रेस सरकार असलेल्या राज्यात नितीश कुमार यांना अनस्टेबल म्हटलं गेले. ही काँग्रेसची नीती आहे. नितीश कुमार महाआघाडीत यावेत पण त्यांची महत्त्वाची भूमिका नको असं काँग्रेसला वाटते. यासाठी नितीश कुमार जबाबदार आहेत असं बिहार भाजपा प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी यांनी म्हटलं.

टॅग्स :congressकाँग्रेसNitish Kumarनितीश कुमारBJPभाजपा