शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी?
2
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
3
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
4
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
5
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
6
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
7
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
8
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
10
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
11
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
12
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
13
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
14
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
15
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
16
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
17
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
18
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
19
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
20
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...

नितीशकुमार म्हणाले, "पंतप्रधानांना मुख्यमंत्री करा"; वक्तव्य झाल्यानंतर करावी लागली सारवासारव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 15:57 IST

रविशंकर प्रसाद यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान केले होते वक्तव्य

एसपी सिन्हा, लोकमत न्यूज नेटवर्क, पाटणा: बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची जीभ दिवसेंदिवस घसरत आहे. विशेषत: जाहीरसभांमध्ये भाषणे करताना ते ‘स्लिप ऑफ टंग’ होत आहे. पटना साहिब लोकसभा मतदारसंघातील दनियावा भागात एनडीएचे उमेदवार रविशंकर प्रसाद यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान मुख्यमंत्रीनितीश कुमार यांची जीभ घसरली आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मुख्यमंत्री करण्याचे आवाहन जनतेला केले. त्यांच्या अंगरक्षकानेही चूक कानात सांगताच नंतर त्यांनी सारवासारव केली.

त्यांनी नऊ मुलांना जन्म दिला...

यासोबतच नितीश कुमार यांनी आपल्या भाषणात लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांच्यावरही जोरदार हल्ला चढवला. लालू प्रसाद यांचे नाव न घेता ते म्हणाले की, त्यांनी नऊ मुलांना जन्म दिला. मुख्यमंत्रिपदी राहिल्यानंतर पत्नीला मुख्यमंत्री बनविले. सतत मुलगा मुलगी करत असतात. आम्ही एकत्र आलो होतो. मात्र आम्हाला खूप त्रास आहे हे दिसल्यावर आम्ही बाहेर पडलो.

चक्क मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे इंधन संपले

नितीश कुमार यांचे सध्या वाईट दिवस चालू आहेत. भाषणादरम्यान जीभ घसरणे आता सामान्य झाले आहे, परंतु आता त्यांचे हेलिकॉप्टरही त्यांना धोका देऊ लागले आहे. मसौढी येथे एका जाहीरसभेला संबोधित केल्यानंतर तेथून निघण्यासाठी मुख्यमंत्री हेलिकॉप्टरमध्ये चढताच पायलटने त्यांना हेलिकॉप्टरचे इंधन संपल्याचे सांगितले.

यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार संतप्त होऊन रस्तेमार्गे निघून गेले. मात्र, ही घटना मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेतील मोठी चूक मानली जात आहे. अधिकाऱ्यांच्या मते हा मोठा निष्काळजीपणा आहे. एकप्रकारे हा मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेशी खेळ आहे. हवेत तेल संपले असते तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारprime ministerपंतप्रधानChief Ministerमुख्यमंत्रीBiharबिहार