शहरं
Join us  
Trending Stories
1
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
2
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
3
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
4
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
5
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
6
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
7
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
8
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
9
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
10
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
11
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
12
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
13
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
14
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
15
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
16
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
17
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
18
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
19
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
20
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली

"नितीश कुमारांनी घ्यावी राहुल गांधींची जागा"

By admin | Published: July 13, 2017 6:03 PM

"कॉंग्रेस पक्षाने नितीश कुमारांकडे नेतृत्त्व द्यावे, कॉंग्रेस आणि नितीश कुमारांची साथ म्हणजे जन्नतमध्ये बनलेल्या जोडीप्रमाणे असेल,

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. 13 - ""कॉंग्रेस पक्षाने नितीश कुमारांकडे नेतृत्त्व द्यावे, कॉंग्रेस आणि नितीश कुमारांची साथ म्हणजे जन्नतमध्ये बनलेल्या जोडीप्रमाणे असेल, कारण कॉंग्रेस म्हणजे कोणताही नेता नसलेला पक्ष आहे तर नितीश कुमार म्हणजे  पक्ष नसलेले नेते आहेत"",  असं मत ज्येष्ठ इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी व्यक्त केलं. इतक्यावरच ते थांबले नाहीत, काँग्रेस पक्षाची संघटनात्मक स्थिती एवढी बिकट आहे की राहुल गांधी यांनी राजकारण सोडून अन्य काही केले तर ते त्यांच्यासाठी, पक्षासाठी व देशासाठीही मोठे उपकार ठरतील असंही ते म्हणाले. सध्याच्या घडीला विरोधकांकडे मोदींना पर्याय ठरू शकेल, असा एकही चेहरा नाही. मात्र, काँग्रेसने नितीश कुमारांकडे नेतृत्त्व द्यायचे ठरवल्यास मोदींचा झंझावात रोखता येणे शक्य आहे असं मत गुहा यांनी मांडलं. 
 
‘इंडिया आफ्टर गांधी’ या आपल्या पुस्तकाच्या दशकपूर्तीनिमित्त एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गुहा म्हणाले की, कदाचित आता काँग्रेस पक्षाची देशाला गरज राहिलेली नाही. त्याची जागा घ्यायला दुसरा एखादा पक्ष उदयाला येऊ शकेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर आव्हान म्हणून उभा राहू शकेल, असा विरोधी पक्षांमध्ये कोणीही नेता नाही, असे सांगून गुहा म्हणाले की, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विरोधकांचे नेतृत्व करावे, असे माझे स्वप्न आहे.
(नितीश कुमार यांना भाजपाकडून पाठिंब्याची ऑफर)
(उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही नितीश कुमारांची मोदींना साथ ?)
(आमच्यात नाही तुमच्यात बदल झालाय, नितीश कुमारांचा काँग्रेसवर पलटवार
हा विचार अधिक स्पष्ट करताना गुहा म्हणाले की, नितिश कुमार हे पक्ष नसलेले नेते आहेत व काँग्रेस हा नेता नसलेला पक्ष आहे. त्यामुळे नितिश कुमार यांनी खेळीमेळीने काँग्रेस पक्ष ताब्यात घेतला तरच विरोधी पक्ष मोदींपुढे टिकाव धरण्याची शक्यता आहे. प्रत्यक्षात असे होणार नाही, हे खरे असले तरी सच्चा लोकशाहीवादी या नात्याने माझे ते स्वप्न आहे.
 
याच मुलाखतीत पंतप्रधान मोदी यांच्याविषयी बोलताना गुहा म्हणाले की, मोदी हे सध्या देशातील सर्वात समर्पित राजकीय नेते आहेत. त्यांच्याकडे काम करण्याची असीम ऊर्जा आहे. राजकारणाशी त्यांची बांधिलकी अतुलनीय आहे. याच जोरावर त्यांनी सत्तेत प्राबल्य, सर्वोपरिता व वरचढपणा मिळविला आहे. मात्र मोदी कट्टर हिंदुत्ववाद्यांपासून दूर राहतील किंवा आर्थिक सुधारणा घडवून आणतील या विश्वासाने त्यांना मते देणाऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे, असेही ते म्हणाले.
 
सन 2007 मध्ये प्रथम प्रसिद्ध झालेल्या गुहा यांच्या या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीत गेल्या दशकातील घडामोडींचा आढावा घेणारी पुरवणी जोडण्यात आली आहे. त्यात त्यांनी काँग्रेस पक्षाचा ऱ्हास, पंतप्रधान मोदी यांचा उदय, वेगवान आर्थिक विकास, त्यासोबत पर्यावरणाची होत असलेली हानी व धुमसते काश्मीर या विषयांवर भाष्य केले आहे.