शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
2
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
3
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
4
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
5
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
6
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
7
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
8
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
9
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
10
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
11
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
12
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
13
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
14
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
15
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
16
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
17
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात
18
आता मनोज जरांगे यांचा भाऊही आंदोलन करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला इशारा
19
‘लाडकी बहीण’पेक्षा कांद्याला भाव द्या, भाजपा-काँग्रेसला उखडून फेकायचे दिवस आलेत: बच्चू कडू
20
"धर्माच्या नावाखाली गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका", निवृत्ती महाराजांचं कळकळीचं आवाहन, कीर्तन चर्चेत

पुन्हा आरजेडीसोबत जाण्याबाबत नितीश कुमार यांचं मोठं विधान, म्हणले...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2024 1:32 PM

Nitish Kumar News: मागच्या दहा वर्षांमध्ये बिहारच्या राजकारणात घडलेल्या राजकीय उलथापालथींचे केंद्र हे नितीश कुमार बनले होते. या दहा वर्षांत नितीश कुमार यांनी त्यांच्या राजीक सोईनुसार भाजपा किंवा आरजेडी या पक्षांशी आघाडी करण्याचे निर्णय घेतले होते.

मागच्या दहा वर्षांमध्ये बिहारच्या राजकारणात घडलेल्या राजकीय उलथापालथींचे केंद्र हे नितीश कुमार बनले होते. या दहा वर्षांत नितीश कुमार यांनी त्यांच्या राजीक सोईनुसार भाजपा किंवा आरजेडी या पक्षांशी आघाडी करण्याचे निर्णय घेतले होते. आता लोकसभा निवडणुकीपूर्वी काही काळ आधी नितीश कुमार हे  इंडिया आघाडीची साथ सोडून भाजपासोबत आले होते. मात्र लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून ते पुढच्या काळात काय भूमिका घेतील, याबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे. तसेच नितीश कुमार हे पुन्हा एकदा आरजेडीसोबत महाआघाडीमध्ये प्रवेश करणार का? याबाबतही विचारणा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांचं एक विधान चर्चेत आहे. 

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या विधानामधून त्यांची आरजेडीसोबत जाण्याबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. आमचा जनता दल युनायटेड पक्ष आरजेडीसोबत आघाडी करणार नाही. आम्ही दोन वेळा आरजेडीसोबत आघाडी केली होती. मात्र आता कधीच त्यांच्यासोबत जाणार नाही.  

दरम्यान, नितीश कुमार यांना २०१३ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीला विरोध करत भाजपासोबतची आघाडी तोडली होती. त्यानंतर २०१७ मध्ये त्यांनी भाजपासोबत पुन्हा एकदा मैत्री केली होती. मात्र दीड वर्षांनंतर त्यांचं पुन्हा एकदा भाजपासोबत बिनसलं आणि  ते आरजेडीसोबत आघाडीत गेले. पण पुन्हा एकदा यावर्षाच्या सुरुवातीला दोघांचीही आघाडी तुटली होती. तसेच नितीश कुमार पुन्हा एकदा एनडीएमध्ये परतले होते. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत भाजपाचं बहुमत हुकल्याने नितीश कुमार यांची केंद्रातील भूमिका महत्त्वाची  बनली आहे. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहारRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दल