शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
2
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
3
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
4
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
5
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
6
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
7
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
8
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
9
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
10
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
11
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
12
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
13
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
14
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
15
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
16
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
17
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
18
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
19
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
20
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा

नितीश कुमार यांच्या मंत्र्याचे लष्कराबाबत वादग्रस्त विधान, नंतर सारवासारव करत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 3:25 PM

Bihar News: बिहारमधील नितीश कुमार सरकारमध्ये सहकार मंत्री असलेल्या सुरेंद्र यादव यांनी अग्निवीरांबाबत हे वादग्रस्त विधान केले आहे. आठ वर्षांनंतर देशाचं नाव हिजड्यांच्या फौजेसाठी घेतलं जाईल, असं त्यांनी म्हटलं आहे...

उद्या पूर्णियामध्ये होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभेची तयारी जोरात सुरू आहे. कटिहारमध्ये याची तयारी मंत्री सुरेश यादव हे करत आहेत. दरम्यान, प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सुरेंद्र यादव यांनी अग्निवीरांबाबत असं विधान केलं आहे, ज्यावरून वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. बिहारमधील नितीश कुमार सरकारमध्ये सहकार मंत्री असलेल्या सुरेंद्र यादव यांनी अग्निवीरांबाबत हे वादग्रस्त विधान केले आहे. आठ वर्षांनंतर देशाचं नाव हिजड्यांच्या फौजेसाठी घेतलं जाईल. अग्निवीर योजना तयार करणाऱ्यांना फासावर लटकवलं पाहिजे, अशी टीका त्यांनी केली आहे. 

बिहार सरकारमधील मंत्री सुरेंद्र यादव सध्या शहराशहरामध्ये, गावागावात जाऊन लोकांना या रॅलीमध्ये येण्यासाठी निमंत्रित करत आहेत. याचदरम्यान, गुरुवारी पत्रकारांसोबत बोलताना त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर जोरदार हल्लाबोल केला. मात्र याचदरम्यान, अग्निवीर योजनेवर टीका करताना त्यांनी येणाऱ्या दिवसांमध्ये ही हिजड्यांची फौज सिद्ध होईल, असं विधान केलं.

मात्र जेव्हा या विधानावरून त्यांना प्रश्न विचारण्यात आले तेव्हा त्यांनी सांगितले की, भारतीय लष्कराबाबत आम्हाला अभिमान आहे. मात्र आजही आम्ही सरकारच्या अग्निवीर योजनेला विरोध करतो. ही योजना ज्याच्या डोक्यातून बाहेर पडली आहे, त्याला फाशी दिली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानBiharबिहारPoliticsराजकारण