शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
Daily Top 2Weekly Top 5

बहुमत चाचणीत नितीशबाबूंचा ‘गेम’ होणार? ४ आमदार असलेल्या मांझींनी वाढवलं NDAचं टेन्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 10:54 IST

Bihar Political Update: गेल्या आठवड्यात घडलेल्या काही नाट्यमय घडामोडींनंतर नितीश कुमार आणि त्यांचा जनता दल युनायटेड पक्ष पुन्हा एकदा एनडीएमध्ये आला. नितीश कुमार यांनी भाजपाच्या पाठिंब्यासह मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता एनडीएमध्येच धुसफूस सुरू झाली आहे.

गेल्या आठवड्यात घडलेल्या काही नाट्यमय घडामोडींनंतर नितीश कुमार आणि त्यांचा जनता दल युनायटेड पक्ष पुन्हा एकदा एनडीएमध्ये आला. नितीश कुमार यांनी भाजपाच्या पाठिंब्यासह मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता एनडीएमध्येच धुसफूस सुरू झाली आहे. नितीश कुमार यांनी खातेवाटप केल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि हम पक्षाचे प्रमुख जीतन राम मांझी हे पुत्र संतोष कुमार यांना मिळालेल्या मंत्रिपदाबाबत नाराज आहेत. तसेच त्यांनी दोन मंत्रिपदांची मागणी केली आहे.  नितीश कुमार सरकारला इशारा देताना मांझी यांनी सांगितले की आम्ही रस्ताही बनवू शकतो आणि गटारही बांधू शकतो. आम्ही ते प्रत्येक काम करू शकतो, जे इतर कुणीही करू शकतो. या विधानावरून मांझी यांचा इशारा हा रस्ते बांधकाम विभागाकडे असल्याचे म्हटले जात आहे. मात्र मांझी हे ऐनवेळी पारडं बदलणार नाही ना, याबाबतची चर्चा सुरू झाली आहे. 

जीतनराम मांझी पुढे म्हणाले की, ही आमच्या घरातील गोष्ट आहे. एका भाकरीनं आमचं पोट भरलं नाही तर आम्ही दोन-तीन भाकऱ्यांची मागणी करणारच ना? आम्हाला किमान दोन भाकऱ्या हव्या आहेत. कारण आम्ही गरीबांचं राजकारण करतो. त्यामुळे आम्हाला असं खातं मिळालं पाहिजे, ज्या माध्यमातून आम्ही ग्रामीण भागात काम करू शकू. आम्ही आमच्या नेत्यांसमोर आमच्या मागण्या ठेवल्या आहेत. आता काय द्यायचं आणि काय नाही द्यायचं हे त्यांच्यावर आहे. 

दरम्यान, एनडीएतील आपल्या सहभागावरही मांझी यांनी मोठं विधान केलं. ते म्हणाले की, हा कुठलाही वाद नाही आहे. त्यामुळे त्यामुळे पाठिंबा देण्यामध्ये किंवा घेण्याच्या धोरणात कुठलाही बदल होणार नाही. आम्ही नितीश कुमार आणि एनडीएसोबत आहोत. तसेच सोबत राहू. १२ फेब्रुवारी रोजी जी बहुमत चाचणी होईल, त्यामध्ये आम्ही एनडीएसोबत राहू. तसेच या बहुमत चाचणीमध्ये एनडीए निश्चितपणे विजयी होऊ. यात कुठलाही किंतु परंतुचा प्रश्न उपस्थित होत नाही. बिहारमध्ये एनडीएचं सरकार कायम राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

बिहार विधानसभेमध्ये बहुमताचा आकडा १२२ आहे. तर एनडीएकडे १२८ आमदार आहेत. हा आकडा बहुमतापेक्षा ६ ने अधिक आहे. जर मांझी यांची  नाराजी कायम राहिल्यास त्यांचे  ४ आमदार  विरोधात जाऊ शकतात अशा परिस्थितीत येथील समिकरणं बदलू शकतात.  

टॅग्स :BiharबिहारPoliticsराजकारणNitish Kumarनितीश कुमारHindustani Awam Morchaहिंदुस्थानी अवाम मोर्चाBJPभाजपा