शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
2
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
3
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
4
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
5
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
6
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
7
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
8
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
9
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
10
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
11
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
12
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
13
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
14
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
15
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
16
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
17
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
18
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
19
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
20
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय

1984च्या नाही, 2002 च्या दंगलींत सरकारचा हात होता - कन्हय्या कुमार

By admin | Published: March 29, 2016 4:11 PM

गुजरातमधल्या दंगली सरकारनं घडवून आणल्या होत्या तर 1984 मध्ये जमावानं दंगली घडवल्या असं वादग्रस्त वक्तव्य कन्हय्या कुमारनं सोमवारी केलं

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 29 - 1984 चं शीख हत्याकांड आणि 2002 मधल्या गुजरातमधल्या दंगली यामध्ये फरक असल्याचे सांगत, गुजरातमधल्या दंगली सरकारनं घडवून आणल्या होत्या तर 1984 मध्ये जमावानं दंगली घडवल्या असं वादग्रस्त वक्तव्य कन्हय्या कुमारनं सोमवारी केलं आहे. गुजरात दंगलींप्रमाणेच सरकार विद्यापीठांमध्ये गळचेपी करत असल्याचा आरोपही कन्हय्याकुमारनं केला आहे. 
आणिबाणी आणि फॅसिझममध्ये फरक असल्याचं मत कन्हय्यानं व्यक्त केलं आहे. आणिबाणीमध्ये फक्त एकाच राजकीय पक्षाचे गुंड गुंडगिरी करतात तर सध्याच्या फॅसिझमच्या अवतारात संपूर्ण सरकारी यंत्रणा गुंडागिरी करते असा दावा त्याने केला आहे. पुढे जात 2002 आणि 1984 या दोन्ही दंगलींमध्येही फरक असल्याचे वक्तव्य त्यानं केलं आहे. 
जमावानं सामान्य माणसाला मारणं आणि सरकारी यंत्रणेचा वापर करत लोकांना मारणं यात फरक आहे असं सांगत 1984 नी 2002 या दोन्ही दंगलींमध्ये हा फरक होता असा त्याचा दावा आहे. 
त्यामुळे सध्याच्या जातीय वातावरणात विद्यापीठांवर हल्ले होत आहेत. हिटलरप्रमाणेच मोदीजींना विचारवंतांचा पाठिंबा नसल्याचा दावा त्याने केला आहे. मोदींच्या राजवटीला विचारवंतांचा पाठिंबा नसल्याचं कन्हय्याचं म्हणणं आहे. 
हा काळ इस्लामोफोबियाचा असल्याचे सांगत कुठल्याही निष्कर्षाला येण्याआधी इतिहास समजून घ्यायला हवा असंही कन्हय्यानं म्हटलं आहे. ज्यावेळी दहशतवाद नी दहशतवादी असे दोन शब्द येतात त्यावेळी मुस्लीम चेहरा समोर येतो, हा इस्लामोफोबिया असल्याचं सांगत हे दोन्ही शब्द बाजुला ठेवा असं त्यानं सांगितलं आहे. 
एका चर्चासत्रात बोलत असताना कन्हय्यानं मोदी सरकारवर चांगलीच टीका केली आहे. मात्र, या वक्तव्यांमुळे त्याच्यावरही टिकेची झोड उठण्याची शक्यता आहे.