शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

विधानसभा निवडणुकीदरम्यान अर्थसंकल्प नको!

By admin | Published: October 12, 2016 5:50 AM

केंद्र सरकारने अर्थसंकल्प नियोजित वेळेपेक्षा आधी मांडण्याचा निर्णय घेतला असला तरी पाच राज्यांच्या निवडणुकांच्या काळात अर्थसंकल्प सादर होणार नाही

नवी दिल्ली : केंद्र सरकारने अर्थसंकल्प नियोजित वेळेपेक्षा आधी मांडण्याचा निर्णय घेतला असला तरी पाच राज्यांच्या निवडणुकांच्या काळात अर्थसंकल्प सादर होणार नाही, याबाबत सरकार गंभीर आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले.पुढील वर्षाच्या सुरुवातीस उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांत पुढील वर्षांच्या सुरुवातीस निवडणुका होत आहेत. या निवडणुकांच्या काळात अर्थसंकल्प सादर झाल्यास मतदारांवर परिणाम होऊ शकतो, तसेच तो आचार संहितेचाही भंग ठरेल, असे बोलले जात आहे. इंग्रजांच्या काळापासून अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या अखेरच्या दिवशी सादर केला जातो. तथापि, त्यामुळे १ एप्रिलपासून म्हणजेच नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवसापासून निधी उपलब्ध करून देणे शक्य होत नाही. त्यामुळे एक महिना आधीच अर्थसंकल्प सादर करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने २१ सप्टेंबर रोजी सैद्धांतिक मंजुरी दिली होती. जेटली यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, अर्थसंकल्पाची संपूर्ण प्रक्रिया आणि वित्त विधेयक वेळेच्या आत पूर्ण होऊन १ एप्रिलपासून अर्थसंकल्प लागू व्हावा अशी आमची इच्छा आहे. सध्या ही प्रक्रिया पूर्ण व्हायला जून उजाडतो. तोपर्यंत मान्सून आलेला असतो. अर्थसंकल्पीय खर्चांचा प्रभावी वापर व्हायला आॅक्टोबर उजाडतो. हा खर्च एप्रिलपासूनच सुरू व्हायला हवा, अशी सरकारची इच्छा आहे. २0१७ मध्ये पाच राज्यांत निवडणुका आहेत. त्यामुळे अर्थसंकल्प व निवडणुका यांचा ताळमेळ घालण्याचा प्रयत्न करीत आहोत. (लोकमत न्यूज नेटवर्क)