शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
2
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
3
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
4
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
5
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, युट्यूबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
6
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
8
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
9
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
10
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
11
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
12
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
13
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
14
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
15
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
16
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
17
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
18
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
19
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
20
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा

'कायदा आणि सुव्यवस्थेशी तडजोड नाही', तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचा तेलगू चित्रपट संघटनेला कडक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 15:41 IST

पुष्पा 2 चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान एका ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. अभिनेता अल्लू अर्जुन या प्रकरणामुळे सतत चर्चेत आहे.आज तेलुगू चित्रपट सृष्टीतील दिग्दर्शक आणि अभिनेते तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची भेट घेतली.

चेंगराचेंगरीच्या वादामुळे अभिनेता अल्लू अर्जुन सतत चर्चेत आहे. काही दिवसापूर्वी पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली होती. आता तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची तेलुगू सिने दिग्दर्शक आणि अभिनेत्यांची भेट घेतली. या भेटीनंतर आता मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. 

मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीला सुरेश बेबी, दामोधर, केएल नारायण, चिन्ना बाबू, बीव्हीएसएन प्रसाद, सुधाकर रेड्डी, चित्रपट दिग्दर्शक कोर्टला सिवा, अनिल रविपुडी, के राघवेंद्र राव, प्रशांत वर्मा, नागार्जुन, शिवा बालाजी आणि व्यंकटेश उपस्थित होते. विशेष म्हणजे कोंडा सुरेखा वादानंतर नागार्जुन मुख्यमंत्र्यांना भेटण्याची ही पहिलीच वेळ होती.

चित्रपटसृष्टीतील कलाकारांसोबतच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी तेलुगू चित्रपटसृष्टीला पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे. संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरीबद्दल बोलताना ते म्हणाले की, स्टार्सनीही त्यांच्या चाहत्यांना नियंत्रित करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. कायदेशीर व्यवस्थेशी कोणतीही तडजोड करता येणार नाही,असंही ते म्हणाले.

पुष्पा 2 अभिनेता अल्लू अर्जुन विरुद्ध रेड्डी यांचे गेल्या काही दिवसापासून एकमेकांविरुद्ध वक्तव्य समोर येत आहेत. पीडितेच्या कुटुंबाचा अधिक विचार करायला हवा, असे मुख्यमंत्र्यांनी अनेकदा सांगितले आहे. रेड्डी यांनी असेही म्हटले आहे की अभिनेत्याने पोलिसांकडे दुर्लक्ष केले आणि त्यांच्या निष्काळजीपणामुळे ही दुःखद घटना घडली.

पुष्पा हा चित्रपट ५ डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. अल्लू अर्जुन हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यान पोहोचला. यावेळी त्याला पाहून चाहत्यांचे नियंत्रण सुटले आणि प्रत्येकजण त्याची एक झलक पाहण्याचा प्रयत्न करत होता. चेंगराचेंगरीमुळे रेवती नावाच्या ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. यावेळी त्यांचा मुलगा जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कारवाई करत पोलिसांनी अल्लू अर्जुनला १३ डिसेंबरला अटक केली. त्याला कनिष्ठ न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र, उच्च न्यायालयाने या अभिनेत्याला दिलासा देत जामीन मंजूर केला.

टॅग्स :Allu Arjunअल्लू अर्जुन