शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

No Confidence Motion : लोकांचा या सरकारवर विश्वास नाही- तारिक अन्वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 17:39 IST

तेलगू देसम पार्टीने मांडलेल्या अविश्वासदर्शक ठरावाला राष्ट्रवादी काँग्रेसनेही पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तारिक अन्वर यांनी लोकसभेत केंद्र सरकारच्या धोरणांना विरोध करणारे भाषण केले.

नवी दिल्ली- तेलगू देसम पार्टीने मांडलेल्या अविश्वासदर्शक ठरावाला राष्ट्रवादी काँग्रेसनेही पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तारिक अन्वर यांनी लोकसभेत केंद्र सरकारच्या धोरणांना विरोध करणारे भाषण केले. नरेंद्र मोदी यांचे सरकार विविध आघाड्यांवर अपयशी ठरल्याचे मत त्यांनी मांडले. पोटनिवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीचा अनेकवेळा पराभव झाला आहे. यावरुन या सरकारवर लोकांचा विश्वास नाही हे स्पष्ट होते अशा शब्दांमध्ये तारिक अन्वर यांनी सरकारवर टीका केली.

आपल्या भाषणामध्ये तारिक अन्वर म्हणाले, ''हे सरकार अच्छे दिनाच्या घोषणा करत सत्तेत आले. लोकांना नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात भारताचे चित्र बदलेल असे वाटले होते. सबका साथ सबका विकास या त्यांच्या घोषणेची आज समिक्षा केल्यास सबका साथही नाही आणि सबका विकासही नाही असे दिसत आहे. या सरकारच्या काळामध्ये केवळ काही परिवारांचा विकास झाला असेल. संपूर्ण जगभरात आपली स्थिती वाईट झाली आहे. या देशात बुद्धिजिवी लोक घाबरुन जगत आहेत. महागाईमुळे सामान्य माणूस गोंधळून गेला आहे. पंतप्रधान देशाचे संरक्षण करणार असे म्हणाले होते, मात्र ज्या बँकांमध्ये गरिबांनी पैसा ठेवला होता, त्या बँकांचा पैसा घेऊन काही मोजके लोक परदेशात पळून गेले, यावेळेस पंतप्रधान आणि सरकार काहीच करु शकले नाहीत.''

हे सरकार दोन माणसे चालवत आहेत. राजनाथ सिंह यांचेही मत विचारात घेतले जात नाही. भाजपाने ज्येष्ठांना मार्गदर्शक मंडळात पाठवले आहे, मात्र त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन घेतले जात नाही. पंतप्रधान विरोधकांचं ऐकत नाहीत पण त्यांनी आपल्या पक्षातील लालकृष्ण अडवाणींसारख्या ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला घेतला तरी त्यांच्या सरकारच्या स्थितीत फरक पडेल. त्यांची स्थिती सुधारेल अशा शब्दांमध्ये तारिक अन्वर यांनी पंतप्रधानांना सल्ला दिला आहे. पंतप्रधान स्वतःच्या पक्षाच्या खासदारांचेही म्हणणे ऐकत नाहीत, पुढील निवडणुकीत त्यांच्या दिडशे पेक्षा जास्त खासदारांचे तिकीट कापले जाणार आहे असे मला भाजपातील लोकांकडून समजले आहे. पुढील काळात या खासदारांचा असंतोष बाहेर येईलच. असेही तारिक अन्वर यांनी सांगितले.

टॅग्स :No Confidence motionअविश्वास ठरावParliamentसंसदNCPराष्ट्रवादी काँग्रेसLal Krishna Advaniलालकृष्ण अडवाणीcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीRajnath Singhराजनाथ सिंहMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशन