शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

विरोधकांचा गदारोळ, सभात्याग, त्यानंतर अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरबाबत बोलले, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 19:13 IST

Narendra Modi: लोकसभेत विरोधकांनी मांडलेल्या अविश्वास प्रस्तावाला (No Confidence motion) उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर मणिपूरमधील हिंसाचाराच्या मुद्द्यावर भाष्य केले.

लोकसभेत विरोधकांनी मांडलेल्या अविश्वास प्रस्तावाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर मणिपूरमधील हिंसाचाराच्या मुद्द्यावर भाष्य केले. मणिपूरच्या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सविस्तरपणे माहिती दिली आहे. त्यांनी सरकार आणि देशाची चिंता सभागृहासमोर मांडली आहे. तिथे ज्या प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत ते पाहता मणिपूरमध्ये शांततेचा सूर्य एक दिवस नक्की उगवेल, असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरुवातीच्या भाषणात मणिपूरचा उल्लेख न केल्याने घोषणाबाजी करत काँग्रेससह विरोधी पक्षांनी सभात्याग केला. 

नरेंद्र मोदी म्हणाले की, मणिपूरच्या स्थितीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी माहिती दिली आहे. त्यांनी सर्व विषय विस्तारपूर्वक मांडले. सरकार आणि देशाची चिंता देशासमोर मांडली आहे. त्यामध्ये देशाच्या जनतेला जागरुक करण्याचा प्रयत्न होता. मात्र विरोधी पक्षांनी या विषयावर राजकारण केलं, असा आरोप नरेंद्र मोदींनी केला.

मोदी म्हणाले की, मणिपूरमध्ये कोर्टाचा एक निर्णय आला. त्यामुळे दोन गटात तणावांच वातावरण निर्माण झालं. त्यात अनेकांनी आपल्या नातेवाईकांना गमावलं आहे. महिलांसोबत अक्षम्य अपराध घडले आहेत. हे अपराध अक्षम्य आहेत. या दोषी व्यक्तींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मात्र मणिपूरमध्ये ज्या प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत, ते पाहता येत्या काळात मणिपूरमध्ये शांततेचा सूर्य नक्की उगवणार आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीManipur Violenceमणिपूर हिंसाचारNo Confidence motionअविश्वास ठराव