शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
2
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
3
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
4
योगींसह 'या' नेत्यांच्या सुरक्षेतून NSG चे ब्लॅक कॅट कमांडो हटवणार, सरकारने आखली नवीन योजना
5
रशिया-युक्रेन युद्धाचा भारताला मोठा फटका! ३ अब्ज डॉलर्सच्या करारवर सही झाली, पण...
6
ओमर अब्दुल्लांच्या सरकारपासून काँग्रेस चार हात लांब; महाराष्ट्र निवडणुकीशी कनेक्शन?
7
"उद्धव ठाकरे आजारी पडल्याचं टायमिंग साधून निवडणुकीची घोषणा, त्यामागे षडयंत्र तर नाही ना?’’ ठाकरे गटाला शंका
8
T20 WC 24 : आम्ही कमी पडलो, तुमचं प्रेम, टीका यासाठी आभार; श्रेयांका पाटीलची प्रामाणिक कबुली
9
गायत्री शिंगणेंची बंडाची तयारी! शरद पवारांनी उमेदवारी दिली नाही, तर...
10
लढायचं की पाडायचं? मनोज जरांगेंनी २० तारखेला बोलावली अंतिम बैठक
11
ठाकरेंवर टीका करून पक्ष सोडला होता; आता ८ महिन्यात शिंदेसेनेलाही रामराम केला, कारण...
12
Maharashtra Assembly Election 2024 : 'एक महिन्यापासून अजितदादांसोबत बोललो नाही'; राजेंद्र शिंगणे मोठा निर्णय घेणार? दिले स्पष्ट संकेत
13
ICC कडून डिव्हिलियर्सला 'हॉल ऑफ फेम'; विराटचे मित्रासाठी लांबलचक पत्र, आठवणी अन्...
14
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर अरबाज खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "कुटुंबात खूप काही..."
15
"...तर समाजवादी पार्टी स्वबळावर निवडणूक लढवणार", अबू आझमींचा महाविकास आघाडीला इशारा
16
गुजरातमध्ये केमिकल फॅक्टरीमध्ये मोठा अपघात! विषारी वायूमुळे पाच कामगारांचा मृत्यू
17
'बिग बॉस'च्या घरातून बाहेर आल्यानंतर गुणरत्न सदावर्तेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- "माझी पत्नी जयश्री..."
18
3 दिवसांत 12 भारतीय विमानांना बॉम्बच्या धमक्या; आता गृहमंत्रालय करणार कडक कारवाई...
19
'मशाली'सारखा 'तुतारी'ला फटका; काँग्रेसच्या सांगली पॅटर्नची विदर्भात पुनरावृत्ती? 
20
राष्ट्रवादीतून मोठी आऊटगोईंग?; प्रश्न विचारताच अजित पवार भडकले, खंबीर असल्याचं सांगत म्हणाले...

जम्मू काश्मीरमध्ये बिघडला 'इंडिया' आघाडीचा खेळ; सत्तास्थापनेत काँग्रेस बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 4:02 PM

नव्या सरकारबाबत काँग्रेसची जी भूमिका समोर आली आहे त्यातून या दोन्ही पक्षात चांगले संबंध नाहीत असं चित्र दिसून येत आहे.

श्रीनगर - जम्मू काश्मीरमध्ये ओमर अब्दुल्ला यांच्या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे. या शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्र्यांसह १० कॅबिनेट मंत्री शपथ घेतील. या सोहळ्याला इंडिया आघाडीतील बहुतांश नेते सहभागी होतील परंतु सोहळ्याआधीच याठिकाणी रंगाचा बेरंग झाला आहे. जम्मू काश्मीरच्या नव्या सरकारमध्ये काँग्रेस सहभागी होणार नाही, आज कुणीही शपथ घेणार नसून सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचा आम्ही विचार करतोय असं काँग्रेसनं स्पष्ट केले आहे.

जम्मू काश्मीरचे काँग्रेस प्रभारी भरत सिंह सोलंकी यांनी म्हटलं की, सध्या नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसमध्ये चर्चा सुरू आहे. चर्चा पूर्ण झाल्यानंतरच पुढचा निर्णय घेतला जाऊ शकतो. चर्चा सुरू असताना आज कुणीही काँग्रेस आमदार शपथ घेणार नाही असं सांगितले. जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस सत्तेत सहभागी होणार की बाहेरून सरकारला पाठिंबा देणार याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. जम्मू काश्मीरची निवडणूक काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सनं एकत्रित लढवली होती. त्यामुळे नव्या सरकारमध्ये काँग्रेस सहभागी असेल असं मानलं जात होते. 

परंतु आज शपथविधी सोहळ्याआधी काँग्रेसनं त्यांची भूमिका स्पष्ट करत सर्वांनाच हैराण केले आहे. काँग्रेस आमदार मंत्रि‍पदाची शपथ घेणार नाहीत याचा अर्थ कॅबिनेट वाटपाबाबत अंतिम तोडगा होऊ शकला नाही किंवा काँग्रेस सरकारला बाहेरुन पाठिंबा देत कुठल्याही प्रकारे दबावात राहू इच्छित नाही. ओमर अब्दुल्ला यांच्या शपथविधीला लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी श्रीनगरला पोहचल्या होत्या. मात्र नव्या सरकारबाबत काँग्रेसची जी भूमिका समोर आली आहे त्यातून या दोन्ही पक्षात चांगले संबंध नाहीत असं चित्र दिसून येत आहे.

दरम्यान, नवीन मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केंद्र सरकारशी जुळवून घेण्याचे संकेत दिलेत. जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्याशी संघर्ष टाळण्याचा प्रयत्न ओमर अब्दुल्ला यांच्याकडून करण्यात येत आहे. मुख्यमंत्री आणि नायब राज्यपाल यांची भूमिका प्रशंसनीय आहे आणि दोन्ही पक्षांनी आपल्या शब्दावर ठाम राहिल्यास जम्मू-काश्मीरच्या जनतेसाठी खूप चांगली गोष्ट असेल. ओमर अब्दुल्ला यांनी आधीच सांगितले आहे की, केंद्राशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडूनही त्यांची अपेक्षा आहे. नायब राज्यपाल आणि केंद्र सरकारमधील संघर्षापेक्षा जम्मू-काश्मीरच्या जनतेने नॅशनल कॉन्फरन्सकडे सोपवलेली जबाबदारी अधिक महत्त्वाची आहे आणि मनोज सिन्हा देखील असेच बोलत आहेत. 

टॅग्स :Omar Abdullahउमर अब्दुल्लाcongressकाँग्रेसBJPभाजपाJammu Kashmirजम्मू-काश्मीर