शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

भारत आता मुस्लिमांचा देश राहिलेला नाही; मेहबूबा मुफ्तींच्या कन्येचं टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 14:20 IST

नागरिकत्व (सुधारणा) विधेयकावरुन मोदी सरकार लक्ष्य

श्रीनगर- नागरिकत्व (सुधारणा) विधेयकावरुन जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या कन्या इल्तिजा जावेद यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. भारत आता मुस्लिमांचा देश राहिलेला नाही, अशा शब्दांमध्ये इल्तिजा जावेद यांनी नागरिकत्व (सुधारणा) विधेयकावरुन सरकारला लक्ष्य करत त्यांची नाराजी व्यक्त केली. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर मुफ्ती यांना ताब्यात घेण्यात आलं. तेव्हापासून त्यांची मुलगी इल्तिजा त्यांची सोशल मीडिया अकाऊंट्स सांभाळते.नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या आराखड्याला काल केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. यानंतर काही तासांमध्ये मेहबूबा मुफ्तींच्या ट्विटरवरुन इल्तिजा यांनी ट्विट केलं. भारत आता मुस्लिमांचा देश राहिलेला नाही, अशा शब्दांत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. नागरिकत्व सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी मिळाल्यास बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून येणाऱ्या अल्पसंख्यांकांना भारताचं नागरिकत्व मिळवण्याची प्रक्रिया सोपी होईल. या विधेयकावर विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवली आहे. सरकार मुस्लिमांशी भेदभाव करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.  मेहबूबा मुफ्ती यांनी याआधीही अनेकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढल्यानंतरही त्यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं होतं. भारत सरकारचा उद्देश भयावह आहे. मुस्लिमांची संख्या जास्त असलेल्या देशातील एकमेव राज्यातील लोकसंख्येचं गणित बदलण्याचा सरकारचा मानस आहे. मुस्लिमांचे अधिकार कमी करुन त्यांना त्यांच्याच राज्यात दुय्यम वागणूक देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, अशी टीका मुफ्ती यांनी केली होती. 

टॅग्स :Mehbooba Muftiमहेबूबा मुफ्तीPDPपीडीपीBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी