शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

'आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून मदत नाही'

By महेश गलांडे | Updated: February 3, 2021 10:14 IST

लोकसभेत शेतकरी आंदोलनासंदर्भात चर्चेचा प्रश्न विचारण्यात आला होता, त्यावर कृषीमंत्री तोमर यांनी उत्तर दिले. तसेच, शेतकरी आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना सरकारकडून कुठलिही आर्थिक मदत देण्यात येणार नसल्याचेही स्पष्टीकरण तोमर यांनी केलं

ठळक मुद्देलोकसभेत शेतकरी आंदोलनासंदर्भात चर्चेचा प्रश्न विचारण्यात आला होता, त्यावर कृषीमंत्री तोमर यांनी उत्तर दिले. तसेच, शेतकरी आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना सरकारकडून कुठलिही आर्थिक मदत देण्यात येणार नसल्याचेही स्पष्टीकरण तोमर यांनी केलं

नवी दिल्ली - दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला दिवसेंदिवस आक्रमता येत असून पाठिंबाही वाढत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गाझीपूर सीमेवर जाऊन शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांची भेट घेतली आणि शेतकरी आंदोलनाला शिवसेनाचा पाठिंबा दर्शवला. तर, पॉपस्टार गायिका आणि अभिनेत्री रिहाना हिनेही शेतकरी आंदोलनासंदर्भात आपण बोलत का नाही? असे म्हणत आंदोलक शेतकऱ्यांचे समर्थन केलंय. गेल्या 68 दिवसांपासून हे आंदोलन सुरु असून अधिक आंदोलनाची धार अधिक तीव्र होताना दिसत आहे. या आंदोलनात अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र, आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना सरकार आर्थिक मदत देणार नसल्याचे कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितलं. 

लोकसभेत शेतकरी आंदोलनासंदर्भात चर्चेचा प्रश्न विचारण्यात आला होता, त्यावर कृषीमंत्री तोमर यांनी उत्तर दिले. तसेच, शेतकरी आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना सरकारकडून कुठलिही आर्थिक मदत देण्यात येणार नसल्याचेही स्पष्टीकरण तोमर यांनी केलं. कोरोनामुळे शेतकरी आंदोलनातील महिला व लहान मुलांना घरी पाठविण्यात यावं, असं आवाहन अनेकवेळा करण्यात आलं होतं, असेही ते म्हणाले. विशेष म्हणजे आत्तापर्यंत शेतकरी आंदोलक आणि सरकारमध्ये चर्चेच्या 11 फेऱ्या झाल्या असून अद्यापही मार्ग निघाला नाही. दरम्यान, लोकसभेत चर्चेदरम्यान विरोधकांनी गोंधळ केल्यामुळे कृषीमंत्र्यांनी शांत राहण्याचं आवाहन केलं. तसेच, सरकार संसद सभागृहात आणि सभागृहाबाहेरही चर्चेला तयार असल्याचं तोमर यांनी म्हटलंय. 

भारतीय किसान युनियनने दावा केला आहे की, आत्तापर्यंत गेल्या 68 दिवसांत 70 पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा या आंदोलनात मृत्यू झाला आहे. त्यामध्ये, थंडी आणि ह्रदयविकाराच्या झटक्यानं मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. थंडीमुळेच महाराष्ट्राच्या गडचिरोली येथील सिताबाई यांचाही याच आंदोलनादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान, सरकारने आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांची आकडेवारी दिली नाही, तसेच त्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासही स्पष्टपणे नकार दिलाय.  

टॅग्स :Narendra Singh Tomarनरेंद्र सिंह तोमरFarmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्या