शहरं
Join us  
Trending Stories
1
"यावेळी रावणाचे अखेरचं दहन"; डुप्लिकेट मेळावा म्हणत संजय राऊतांची CM शिदेंवर टीका
2
देवदूत बनून आला पायलट! हायड्रोलिक खराब, ३ तास हवेतच घिरट्या, १४० जणांच्या जीवाला होता धोका; नेमकं काय घडलं?
3
Sanjay Raut : 'आता मेळाव्याची लाट, लोक डुप्लिकेट मेळावे घेतात; संजय राऊतांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खोचक टोला
4
T20 WC FINAL : मी दुखापतीचं नाटक केलं आणि खेळ मुद्दाम थांबवला; पंतने सांगितला वर्ल्ड कपमधील किस्सा
5
प्रेमासाठी काय पण! गर्लफ्रेंडला खूश करण्यासाठी ३ मित्रांचा कारनामा; खावी लागली जेलची हवा
6
असा एकमेव अभिनेता ज्याने रुपेरी पडद्यावर साकारले श्रीराम, श्रीकृष्ण आणि रावण! तुम्ही ओळखलं?
7
Zerodha Nithin Kamath : ब्रोकर्स कधीही करू शकणार नाही 'हे' काम, SEBI च्या नव्या नियमांवर काय म्हणाले नितीन कामथ
8
Multibagger Stock: केवळ एका वर्षात ₹१ लाखाचे बनले ₹२० लाख; 'या' SME कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
"देशात कट्टरतावादाला चिथावणी देणाऱ्या घटनांमध्ये अचानक वाढ"; सरसंघचालकांनी व्यक्त केली चिंता
10
"OTT प्लॅटफॉर्ममुळे तरुणांवर वाईट परिणाम"; नियंत्रणासाठी कायदा करण्याची सरसंघचालकांची मागणी
11
Video - रस्त्यावरुन जात होती २ लहान मुलं, अचानक कोसळलं घर; थरकाप उडवणारी घटना
12
"गेली पाच वर्षे तुमचा अपमान करुन..."; पॉडकास्टमधून राज ठाकरेंचे मतदारांना आवाहन
13
सूर जुळले! अखेर अंकिताने दाखवला कोकण हार्टेड बॉयचा चेहरा, कोण आहे तो?
14
कमी पैशांमध्ये अधिक व्हॅलिडिटीचा प्लॅन शोधताय? BSNL चा हा प्लॅन ठरेल बेस्ट
15
७५ किमीचा वेग, मेन लाईन ऐवजी लूप लाईनमध्ये एन्ट्री अन् धडक; नेमका कसा झाला अपघात?
16
Ratan Tata Successor Noel Tata : बुर्ज खलिफाशी आहे 'टाटा'चं कनेक्शन; Tata Trust चे अध्यक्ष नोएल टाटांवर आहे जबाबदारी
17
खळबळजनक! ऑनलाईन गेममध्ये अडकला जवान; रायफलसह आर्मी कँपमधून झाला फरार अन्...
18
भयंकर! जमीन हडपण्यासाठी स्वतःवर झाडली गोळी; पोलिसांच्या मदतीने रचला फिल्मी कट, अखेर...
19
दसरा मेळाव्यात ‘आव्वाज’ कुणाचा? उद्धवसेना वि. शिंदेसेना जुगलबंदी; गर्दीचा उच्चांक कोण मोडेल?
20
जामनेरमधून गिरीश महाजनांऐवजी त्यांच्या पत्नीला उमेदवारी; देवेंद्र फडणवीसांची घोषणा

...ताेपर्यंत घरवापसी नाहीच; शेतकरी ठाम 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2021 6:53 AM

Farmer Protest : चर्चेची ८वी फेरीही निष्फळ. मागच्या वेळच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी लंगरमधून आलेल्या जेवणाचा आस्वाद मंत्रिगटाने घेतला होता. मात्र, सोमवारच्या बैठकीत उभय पक्षांनी सहभोजनाला प्राधान्य दिले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : शेतीविषयक कायदे रद्द करण्याच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यात निर्माण झालेला तिढा अद्याप कायम आहे. सोमवारी उभयतांमध्ये झालेल्या चर्चेची आठवी फेरी निष्फळ ठरली. आता पुन्हा ८ जानेवारी रोजी उभय पक्षांमध्ये बैठक होणार आहे. 

केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर, रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि वाणिज्य राज्यमंत्री सोम प्रकाश या मंत्रिगटाने सोमवारी ४० शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी विज्ञान भवन येथे चर्चा केली. उभयतांमध्ये होणारी ही चर्चेची आठवी फेरी होती. चार तास चाललेल्या या बैठकीत केंद्राने तीनही कायदे रद्द करावेत, हा आग्रह शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी कायम ठेवला, तसेच किमान हमीभावाच्या (एमएसपी) मुद्द्यावरही चर्चा झाली. कृषी कायदे रद्द न करण्याच्या निर्णयावर मंत्रिगट ठाम राहिला. दोन्हीकडच्या सदस्यांचा समावेश असलेली एक समिती नेमून या संदर्भात सन्माननीय तोडगा काढला जावा, असा पर्याय मंत्रिगटाने सुचविला. मात्र, शेतकरी संघटनांनी तो धुडकावून लावला. चार तास चाललेली चर्चा निष्फळ ठरल्याने, आता ८ जानेवारीला पुन्हा एकदा बैठक घेण्याचे ठरले आहे. 

सहभोजनाकडे पाठ मागच्या वेळच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी लंगरमधून आलेल्या जेवणाचा आस्वाद मंत्रिगटाने घेतला होता. मात्र, सोमवारच्या बैठकीत उभय पक्षांनी सहभोजनाला प्राधान्य दिले नाही. जेवणाच्या सुट्टीदरम्यान शेतकरी संघटनांचे नेते लंगरमधून आलेले जेवण घेत होते, तर मंत्रिगट दुसऱ्या कोपऱ्यात चर्चेत गुंतला असल्याचे दृश्य विज्ञान भवनात होते. 

चर्चेवेळी वातावरण चांगले होते. शेतकरी संघटनांच्या नेत्यांचा दृष्टिकोन सकारात्मक होता. शेतकऱ्यांचा केंद्र सरकारवर विश्वास आहे, म्हणूनच ते चर्चेला प्रतिसाद देतात. आता पुढील बैठक ८ जानेवारीला होणार आहे. त्यात कृषी कायदे आणि एमएसपी हे दोन मुद्दे असतील. सरकारला देशभरातील शेतकऱ्यांचा विचार करून चर्चा करायची आहे. दोन्ही बाजूंनी सन्माननीय तोडगा निघण्याची आशा आहे. टाळी शेवटी दोन्ही हातानेच वाजते. - नरेंद्रसिंह तोमर, केंद्रीय कृषिमंत्री 

    कंत्राटी शेतीमध्ये रस नाही : रिलायन्सn कृषी कायद्यांविरोधात पंजाब आणि हरयाणातील शेतकऱ्यांनी राज्यांतील रिलायन्स जिओचे मोबाइल टॉवर्सची नासधूस केली. या विरोधात रिलायन्स कंपनीने दोन्ही राज्यांतील हायकोर्टात धाव घेतली आहे. n पंजाब आणि हरयाणातील सरकारांना आमच्या मालमत्तांचे रक्षण करण्याचे निर्देश देण्यात यावे, अशी मागणी रिलायन्सने केली आहे, तसेच रिलायन्सने कधीच कंत्राटी शेती केली नाही आणि भविष्यातही तसे काही करण्याचे प्रयोजन नाही, असेही रिलायन्सकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

जोपर्यंत केंद्र सरकार तीनही कायदे रद्द करत नाही, तोपर्यंत आम्ही घरी परत जाणार नाही. एमएसपीला कायद्याचे स्वरूप देण्याच्या मुद्द्यावरूनही एकमत झालेले नाही. आता ८ जानेवारीला होणाऱ्या बैठकीत एमएसपी आणि कायदे रद्द करणे या दोन मुद्द्यांवरच चर्चा होईल.     - राकेश टिकैत, शेतकरी नेते

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरी