शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

नव्या कृषी कायद्यांमुळे देशात एकही मंडई बंद झालेली नाही- पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2021 06:57 IST

कायदे लागू करण्याचा सर्वस्वी अधिकार राज्यांना

नवी दिल्ली : तिन्ही कृषी कायद्यांमुळे देशातील एकही मंडई बंद झालेली नाही. एमएसपी बंद झालेली नाही वा बंद होणारही नाही. एमएसपीमध्ये सरकारने वाढच केली आहे. कृषी कायद्यांविषयी वेगळी भूमिका घेणाऱ्या शेतकऱ्यांविषयीही आम्हाला आदरच आहे आणि म्हणूनच आमचे ज्येष्ठ मंत्री त्यांच्याशी सतत चर्चा करीत आहेत, असे स्पष्ट प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी लोकसभेत केले. या भाषणावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याह अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सभात्याग केला.राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले की सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठीच कायदे केले. पण ते लागू करण्याचा वा न करण्याचा अधिकार सर्व राज्यांना आहे. ‘आंदोलनजीवींना काहीही मान्य नसते’आंदोलनाला आपण पवित्रच मानतो. मात्र आंदोलनकारी व आंदोलनजीवी यांच्यात आपण फरक करायला हवा. आंदोलनजीवी ही अशी जमात आहे जिला कोणतीच गोष्ट मान्य नसते. प्रत्येक चांगल्या गोष्टीत हे खुसपटे काढत राहतात. कुठेही काही सुरू असेल तर तिथे जातात. टोल प्लाझो फोडणे, टेलिफोनचे टॉवर तोडणे, हे प्रकार शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्यासाठीच होते, असे वाटत नाही का, असा सवाल करून मोदी म्हणाले की, सार्वजनिक क्षेत्र महत्वाचेच आहे. पण यापुढील काळात खासगी क्षेत्राला टाळून चालणार नाहीकाँग्रेस गोंधळलेला पक्षकृषी कायद्यांबाबत काँग्रेस राज्यसभेत एक, तर लोकसभेत वेगळी भूमिका घेत आहे, अशी टीका पंतप्रधानांनी केली. एकूणच काँग्रेस पक्ष गोंधळलेला आहे. असा पक्ष देशाचे भले करू शकणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.कायद्यात बदल करण्याची तयारी तिन्ही कृषी कायद्यांतील प्रत्येक बाबीवर शेतकऱ्यांशी चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. या कायद्यांत प्रसंगी बदल करण्याचीही तयारी आहे, विरोधी पक्ष मात्र शेतकऱ्यांमध्ये गैरसमज निर्माण करीत आहेत, असा आरोप मोदी यांनी केला.महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी पुढाकार घेतला. त्यांनाही विरोध सहन करावा लागला. पण त्यांनी तेव्हा जे केले, त्यामुळेच भारतीय स्त्रिया सर्व क्षेत्रात अग्रेसर आहे. कृषी कायद्यांतूनही शेतकऱ्याचे भले होईल, असे मी खात्रीने सांगतो.     - पंतप्रधान मोदी

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFarmers Protestशेतकरी आंदोलन