शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

आमच्या जमिनीवर कोणीही कब्जा करू शकत नाही - अमित शाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2023 17:54 IST

Amit Shah in Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या अमित शाह यांनी 'व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम' (व्हीव्हीपी) सुरू केला.

गृहमंत्री अमित शाहअरुणाचल प्रदेश दौऱ्यावर आहेत. अमित शाह यांनी सोमवारी अरुणाचल प्रदेशातून विरोधकांना सडेतोड उत्तर दिले. भारताच्या सीमा पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि आमच्या जमिनीवर कोणीही कब्जा करू शकत नाही, असे अमित शाह म्हणाले. याशिवाय, भारत-चीन सीमेजवळील किबिथू गावात चीनचे नाव न घेता अमित शाह म्हणाले की, आज संपूर्ण देश शांततेत झोपला आहे, कारण आमचे आयटीबीपी जवान आणि लष्कर रात्रंदिवस सीमेवर पहारा देत आहेत. आमच्याकडे वाईट नजर टाकण्याची कोणाची हिंमत नाही.

अरुणाचल प्रदेशच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या अमित शाह यांनी 'व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम' (व्हीव्हीपी) सुरू केला. गृहमंत्री झाल्यानंतर अमित शाह यांचा अरुणाचल प्रदेशचा हा पहिलाच दौरा आहे. ते म्हणाले, 2014 पूर्वी संपूर्ण ईशान्य प्रदेश हा अशांत क्षेत्र म्हणून ओळखला जात होता. पण, गेल्या 9 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणामुळे ईशान्य हा देशाच्या विकासात योगदान देणारा प्रदेश मानला जातो. 

अमित शाह म्हणाले, "21 ऑक्टोबर 1962 रोजी कुमाऊँ रेजिमेंटचे तत्कालीन 6 अधिकारी येथे शौर्याने लढले आणि ज्यांच्या सहाय्याने भारताच्या भूमीचे रक्षण होऊ शकले, मला त्यांना श्रद्धांजली वाहायची आहे. त्यांची संख्या आणि शस्त्रेही कमी होती. पण 1963 मध्ये टाईम मॅगझिनमध्ये असे लिहिले होते की, किबिथू येथे झालेल्या लढाईत भारतीय सैन्याकडे कमी शस्त्रे होती, परंतु संपूर्ण जगातील सैन्यांमध्ये सर्वात जास्त शौर्य होते."

याचबरोबर, पूर्वी सीमाभागात येणारे लोक म्हणायचे की, ते भारताच्या शेवटच्या गावातून आलो आहे, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे नॅरेटिव्ह बदलले आहे. आता इथून गेल्यावर लोक म्हणतात की, मी भारतातील पहिल्या गावातून आलो आहे, असेही अमित शाह म्हणाले. दरम्यान, 'व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम' अंतर्गत, अरुणाचल प्रदेश, सिक्किम, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि केंद्रशासित प्रदेश लडाखमधील उत्तर सीमेवरील 19 जिल्ह्यांच्या 46 ब्लॉकमध्ये 2967 गावे विकसित केली जाणार आहेत.

टॅग्स :Amit Shahअमित शाहArunachal Pradeshअरुणाचल प्रदेश