शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

"आता ते कुणीही हटवू शकत नाही..."; सेंगोल हटवण्याच्या मागणीवरून गदारोळ, भाजपचं SP-काँग्रेसला प्रत्युत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2024 13:26 IST

सेंगोल हे राजेशाहीचे प्रतीक असल्याचे म्हणत, ते काढून टाकावे आणि त्या जागेवर संविधान स्थापन करावे, अशी मागणी समाजवादी पक्षाने (एसपी) केली आहे. 

लोकसभा निवडणूक 2024 नंतर संसदेचे पहिले अधिवेशन सुरू आहे. नवनिर्वाचित लोकसभा सदस्यांचा शपथविधीनंतर आणि सभापती निवडीनंतर आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दोन्ही सभागृहांच्या संयुक्त सत्राला संबोधित केले. यानंतर, संसदेत स्थापन करण्यात आलेल्या सेंगोलवरून राजकारण तापले आहे. विरोधी पक्षांनी संसद भवनातील सभापतींच्या आसनाजवळ लावण्यात आलेला सेंगोल हटवण्याची मागणी केली आहे. सेंगोल हे राजेशाहीचे प्रतीक असल्याचे म्हणत, ते काढून टाकावे आणि त्या जागेवर संविधान स्थापन करावे, अशी मागणी समाजवादी पक्षाने (एसपी) केली आहे. 

"संविधान महत्वाचे" -यासंदर्भात, समाजवादी पक्षाचे राज्यसभा खासदार आरके चौधरी म्हणाले, "संविधान महत्त्वाचे आहे, ते लोकशाहीचे प्रतीक आहे. आपल्या गेल्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने संसदेत 'सेंगोल' स्थापन केले आहे. 'सेंगोल' म्हणजे 'राजदंड', याचा अर्थ 'राजाचा दंड' असाही होतो. राजेशाही संपवून देश स्वतंत्र झाला. देश 'राजाच्या दंडा'ने चालणार की संविधानाने? संविधान वाचवण्यासाठी संसदेतून सेंगोल हटविले जावे," अशी माझी मागणी आहे.

काय म्हणाले अखिलेश यादव? -आरके चौधरी यांच्या विधानावर बोलताना समाजवादी पक्षाचे प्रमुख तथा खासदार अखिलेश यादव म्हणाले, "जेव्हा सेंगोल स्थापन करण्यात आला तेव्हा पंतप्रधान त्याच्यासमोर नतमस्तक झाले होते. कदाचित शपथ घेतांना ते हे विसरले. यामुळे, माझ्या पक्षाने त्यांना याची आठवण करून देण्यासाठी असे म्हटले असू शकते, असे मला वाटते. जर पंतप्रधानच त्याच्यासमोर नतमस्तक व्हायरला विसरले असतील, तर कदाचित त्यांचीही आणखी काही इच्छा असेल." अखिलेश यांच्या विधानावर शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनीही, संविधान महत्वाचे आहे. आम्ही इंडिया ब्लॉकमध्ये यावर चर्चा करू, असे म्हटले आहे. 

समाजवादी पक्षाला काँग्रेस-आरजेडीचंही समर्थन -यामुद्यावर काँग्रेस आणि आरजेडीनेही समाजवादी पक्षाचे समर्थन केले आहे. काँग्रेस खासदार रेणुका चौधरी यांनी, भाजपने आपल्या मनाने सेंगोल लावला आहे. सपाची मागणी योग्य आहे. सभागृह सर्वांना सोबत घेऊन चालते. भाजप केवळ मनमानी करते, असे म्हटले आहे. तर आरजेडी नेत्या मीसा भारती यांनी, सेंगोल हटवायला हवे, हे लोकशाहीत आहे, राजेशाहीत नाही. सेंगोल म्यूझियममद्ये लावायला हवा. हे राजेशाहीचे प्रतिक आहे. यामुळे सेंगोल हटायला हवा.

भाजपचं प्रत्युत्तर -आरके चौधरी यांच्या वक्तव्यावर भाजपचे लोकसभा खासदार खगेन मुर्मू म्हणाले, या लोकांना दुसरे काही काम नाही. यांनी संविधानाच्या बाबतीत लोकांमध्ये गैरसमज पसरवला. हे लोक संविधानाला मानत नाहीत. उलट मोदीजी संविधानाला अधिक सन्मान देतात. खासदार महेश जेठमलानी म्हणाले, सेंगोल हे देशाचे प्रतिक आहे. सेंगोल स्थापन करण्यात आले, ते आता कुणही हटवू शकत नाही.

केंद्रीय मंत्री जयंत चौधरी म्हणाले, ही लोक अशीच सर्व कामे करतात. हे देशाचे सर्वोच्च सभागृह आहे. हे लोक प्रसिद्धीसाठी असे बोलतात. आपण सर्वच जण संविधानाला मानतो. एकट्या समाजवादी पक्षाने संविधानाचा ठेका घेतलेला नाही.

टॅग्स :ParliamentसंसदSamajwadi Partyसमाजवादी पार्टीcongressकाँग्रेसBJPभाजपा