शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
5
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
6
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
7
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
8
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
9
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
11
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
12
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
13
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
14
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
15
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
16
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
17
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
18
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
19
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
20
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही

शौचालयात अन्न शिजवण्यास हरकत नाही, महिला मंत्र्याचं वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 14:45 IST

'शौचालयाच्या खोलीत जर टॉयलेट सीट आणि जेवण तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा स्टोव्ह यामध्ये विभाजक असेल तर शौचालयामध्ये अन्न शिजवण्यास काही हरकत नाही'

ठळक मुद्देमध्य प्रदेशच्या महिला-बाल विकास मंत्री इमरती देवी यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे.शौचालयात अन्न शिजवण्यास हरकत नाही असं विधान केलं आहे.अंगणवाडी आणि इतर कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. 

नवी दिल्ली - मध्य प्रदेशच्या महिला-बाल विकास मंत्री इमरती देवी यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. 'शौचालयाच्या खोलीत जर टॉयलेट सीट आणि जेवण तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा स्टोव्ह यामध्ये विभाजक असेल तर शौचालयामध्ये अन्न शिजवण्यास काही हरकत नाही' असं अजब विधान इमरती देवी यांनी केलं आहे. मध्य प्रदेशच्या एका जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रामधील कर्मचारी मुलांसाठी शौचालयाच्या खोलीत अन्न शिजवत असल्याची घटना नुकतीच समोर आली होती. या घटनेवर प्रतिक्रिया देताना इमरती देवी यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे.

'अंगणवाडी केंद्रातील शौचालयात टॉयलेट सीट आणि स्टोव्ह यांच्यामध्ये विभाजक बसवलेला हे समजून घ्या. आपल्या घरातही अशाच प्रकारे टॉयलेट-बाथरूम अटॅच असलेले पाहायला मिळतात. जर आपल्या घरात अशा प्रकारचे अटॅच बाथरुम असेल आणि त्यावरुन जर आपल्या नातेवाईकांनी आपल्या घरी जेवण करण्यास नकार दिला तर आपण काय बोलाल?, शौचालयात अन्न शिजवण्यास हरकत नाही' असं इमरती देवी यांनी म्हटलं आहे.

महिला आणि बाल विकास कार्यक्रमाचे जिल्हा अधिकारी देवेंद्र सुंद्रयाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंगणवाडी केंद्रात एका शौचालयासह असलेल्या छोट्या स्वयंपाकघरात मुलांसाठी अन्न शिजवण्यात आले आहे. याप्रकरणात सहभागी असलेल्या अंगणवाडी आणि इतर कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. 

इमरती देवी यांना याआधी प्रजासत्ताक दिनी लिहून देण्यात आलेले भाषण वाचता आले नव्हते. त्यांनी आपले काम जिल्हाधिकाऱ्यांना करण्यास भाग पाडले. दरम्यान, यासंबंधीचा व्हिडीओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. ग्वालियर येथील एसएएफ ग्राऊंडमध्ये 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इमरती देवी यांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, या कार्यक्रमात भाषणादरम्यान इमरती देवी यांची चांगलीच दमछाक झाली. लिहून दिलेले भाषण त्यांना पूर्ण वाचता आले नाही. जवळास भाषणातील 50 शब्द त्यांनी अडखळत वाचले. त्यामधीलही काही शब्द चुकीचे उच्चारले. त्यानंतर त्यांनी भाषण अर्धवट सोडले आणि भाषण वाचण्याची धूरा चक्क जिल्हाधिकाऱ्यांवरच टाकली. त्यानंतर जिल्हाधिकारी भरत यादव यांनी त्यांचे भाषण पूर्ण वाचून दाखविले होते.  

 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशfoodअन्न