शहरं
Join us  
Trending Stories
1
"आधी म्हणत होते अक्षय शिंदेला फाशी द्या, आता...", अजित पवार 'मविआ'वर बरसले
2
दुधाच्या अनुदान वाढीवरून अजित पवार आणि विखे पाटलांमध्ये खडाजंगी; बैठकीत नेमकं काय घडलं?
3
ही आहेत चार प्रभावशाली कुटुंब, ज्यांच्याकडे आहे तिरुपतीच्या पूजेची जबाबदारी, एवढं मिळतं मानधन, आहे कोट्यवधीची संपत्ती
4
Telegram सीईओ Pavel Durov दबावाला बळी पडले? IP Address, नंबर शेअर करणार!
5
तिरुपती लाडू वाद: मंदिरात सफाई, देवाची माफी मागणार; पवन कल्याण करणार ११ दिवस प्रायश्चित्त
6
“विरोधकांनी राजकारण करायची गरज नाही”; अक्षय शिंदे एन्काउंटरवर रामदास आठवले थेट बोलले
7
Akshay Kumar : "आवाज केला असता तर गोळ्या घातल्या असत्या"; अक्षय कुमारने सांगितला चंबळचा थरारक अनुभव
8
रद्द करण्यात आलेले तीन कृषी कायदे परत आणावेत; कंगना राणौतची मोठी मागणी
9
T20 World Cup 2024 : 'स्वप्न'पूर्तीसाठी टीम इंडिया सज्ज! 'मन' खूप झालं आता 'जग' जिंकण्यासाठी हरमन है तय्यार
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या राजीनामा देणार? सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर ठरणार भवितव्य
11
शेअर बाजारावर बॉट्सचा ताबा, FII ट्रेडर्सनं अल्गोरिदममध्ये फेरफार केला; ५९००० कोटींची कमाई : SEBI
12
पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह, अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी ठाकरे गट कोर्टात जाणार
13
"मी शरद पवारांना दैवत मानत आलोय", अजित पवार सुप्रिया सुळेंवर का भडकले?
14
स्वच्छता कर्मचारी गोळ्या कसा झाडेल? अक्षय शिंदे एन्काउंटरवर संजय राऊतांच्या फैरीवर फैरी
15
पाकिस्तान क्रिकेटला लवकरच 'अच्छे दिन'! कोच कर्स्टन यांना विश्वास; खेळाडूंसमोर ठेवल्या ३ अटी
16
KL राहुल मर्जीतला; टीम इंडियात सुरुये Sarfaraz Khan ला रिलीज करण्याचा विचार
17
Monkeypox : टेन्शन वाढलं! ज्याची भीती होती तेच घडलं; भारतात पोहोचला मंकीपॉक्सचा खतरनाक व्हेरिएंट
18
IND vs BAN: "...तर अश्विनला आधीच निवृत्ती घ्यायला लावली असती"; माँटी पानेसारचे मत
19
Munawar Faruqui buys Flat in Mumbai: मुनव्वर फारुकीने मुंबईत खरेदी केला कोट्यवधींचा फ्लॅट, कुठून होते इतकी कमाई?
20
नवीन मोबाईलची खरेदी अन् आयुष्याचा शेवट! मित्रांनीच केला घात, पार्टी न दिल्याने तरुणाची हत्या

नोटाबंदीचा निर्णय हा काळ्या पैशावरील थेट हल्ला - नरेंद्र मोदी

By admin | Published: December 29, 2016 8:50 PM

नोटाबंदीचा निर्णय हा काळ्या पैशावर केलेला थेट हल्ला आहे. या निर्णयामुळे काळा पैसा साठवणाऱ्यांना तो बाहेर काढावा लागला आहे. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. 29 -  नोटाबंदीचा निर्णय हा काळ्या पैशावर केलेला थेट हल्ला आहे. या निर्णयामुळे काळा पैसा साठवणाऱ्यांना तो बाहेर काढावा लागला आहे. या निर्णयामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेस मजबुती मिळणार असून, विविध क्षेत्रात निर्माण होणाऱ्या रोजगारांमध्ये वाढ होणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. 
नोटाबंदीच्या निर्णयानंतर प्रथमच प्रसारमाध्यमांशी थेट संवाद साधताना दिलेल्या मुलाखतीत नरेंद्र मोदी यांनी या निर्णयाची आवश्यकता आणि होणाऱ्या परिणामांबाबत सविस्तर माहिती दिली. मोदींनी इंडिया टुडे या नियतकालिकाला ही मुलाखत दिली आहे. इंडिया टुडेच्या पुढील अंकात ही मुलाखत प्रकाशित होणार आहे. 
 या मुलाखतीदरम्यान नोटाबंदीबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना मोदी म्हणाले, "500 आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा घेण्यात आलेला निर्णय हा भ्रष्टाचारावर केलेला थेट हल्ला आहे. या निर्णयामुळे काळा पैसा जमा करणाऱ्यांना तो बाहेर काढावा लागला आहे.  भ्रष्टाचारी आणि काळा पैसावाल्यांविरोधात केलेला थेट हल्ला आहे. भ्रष्टाचाऱ्यांविरोधात आम्ही 'तू डाल डाल, मै पात पात' असे धोरण स्वीकारले आहे."
काळा पैसा पांढरा करण्याचे प्रयत्न झाले तरी काळा पैसावाले वाचणार नसल्याचा दावा मोदींनी केला."नोटाबंदीनंतर काळा पैसा पांढरा करण्याचे अनेकांनी प्रयत्न केले, पण अशा प्रत्येकाची माहिती आम्हाला मिळाली आहे. काळा पैसावाले आपली ओळख लपवू शकणार नाहीत. दुसऱ्याच्या खात्यात पैसे जमा केले तरी त्यांच्यासाठी वाचणे अशक्य आहे. काळा पैसा संपवणे हे आमचे लक्ष्य. बेहिशोबी मालमत्ताधारकांना अजून एक संधी देत आहोत."
मोदी पुढे म्हणाले, "काळा पैसा बँकींग व्यवस्थेत यावा अशी आमची इच्छा होती. नोटाबंदीमुळे मोठ्या प्रमाणावर काळा पैसा मुख्य प्रवाहात आला आहे.  नोटाबंदीमुळे बॅंकात जमा झालेल्या पैशामुळे अर्थव्यवस्थेच मजबुती मिळणार आहे. त्यातून कृषी, उप्तादन आणि सेवा क्षेत्रात रोजगार वाढण्यास मदत होईल. " .यावेळी डि़जिटल व्यवहारांचे प्रमाण वाढणे आवश्यत असल्याचेही त्यांनी सांगितले. 
उत्तर प्रदेशात काही महिन्यांनी होत असलेल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आलेला नाही.  तसेच राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्यांच्या पद्धतीत पारदर्शकता आणण्यासाठी आग्रही असल्याचेही मोदींनी मुलाखतीत सांगितले.