शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
5
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
6
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
7
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
8
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
9
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
10
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

दोन दशकांत जमिनीतील पाणी आटले, संकट वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2024 10:35 AM

धक्कादायक निष्कर्ष, दोन दशकांत ४५० घन किलोमीटरचा फटका

नवी दिल्ली: एका नवीनअभ्यासानुसार २००२ ते २०२१ दरम्यान उत्तर भारतात भूजल सुमारे ४५० घन किलोमीटरने घटले असून, हवामान बदलामुळे येत्या काही वर्षांत भूजल पातळी आणखी कमी होण्याची भीती एका अभ्यासात व्यक्त करण्यात आली आहे.

आयआयटी गांधीनगर येथील अभियांत्रिकी आणि भू-विज्ञान विभागाचे प्रमुख आणि विक्रम साराभाई केंद्राचे प्राध्यापक, संशोधक विमल मिश्रा यांनी सांगितले की, भूजल संसाधनांवर दबाव आणखी वाढेल, असे अभ्यासात असे दिसून आहे.

भूजलाचे फेरभरण होण्यासाठी आम्हाला पाऊस कमी तीव्रतेचा, परंतु अधिक दिवस पडण्याची गरज आहे, सिंचनासाठी पाण्याची वाढती मागणी आणि भविष्यात भूजल फेरभरण कमी झाल्याच्या एकत्रित परिणामामुळे आधीच वेगाने कमी होत असलेल्या संसाधनावर अधिक ताण येऊ शकतो - विमल मिश्रा, संशोधक, आयआयटी गांधीनगर

पाऊस घटला, हिवाळा उबदार

उपग्रह डेटा आणि अभ्यासावरून संशोधकांना आढळले की संपूर्ण उत्तर भारतात मान्सून (जून ते सप्टेंबर) पर्जन्यमान १९५१-२०२१ दरम्यान ८.५ टक्के कमी झाले आहे. तसेच, याच काळात देशातील हिवाळा ऋतू ०.३ अंश सेल्सिअस अधिक उष्ण झाला आहे.

कोरड्या मान्सूनमुळे पावसाच्या कमतरतेच्या कालावधीत पिके टिकवून ठेवण्यासाठी भूजलावर अधिक अवलंबून राहावे लागते. पावसाळ्यात तर उबदार हिवाळ्यामुळे भूजल फेरभरणात सुमारे ६ ते १२ टक्क्यांनी मोठी घट होईल, असा अंदाज आहे. हे संशोधन 'अर्ब्स फ्यूचर' या नियतकालिकात प्रकाशित झाले आहे.

असा येतो भूजलावर दबाव

हैदराबादस्थित राष्ट्रीय भूभौतिक संशोधन संस्थेच्या (एनजीआरआय) संशोधकांच्या चमूने अभ्यासात म्हटले आहे की, पावसाळ्यात कमी पाऊस आणि उबदार हिवाळ्यामुळे सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढेल आणि भूजल फेरभरण कमी होईल. याम यामुळे उत्तर भारतातील आधीच कमी होत असलेल्या भूजल संपत्तीवर आणखी दबाव येईल.

टॅग्स :water shortageपाणीकपातRainपाऊसmonsoonमोसमी पाऊस