शहरं
Join us  
Trending Stories
1
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
2
आजचे राशीभविष्य ११ ऑक्टोबर २०२४; या राशीला मोठा आर्थिक लाभ, इतरांनी...
3
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
4
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
5
रतन टाटा यांचे कलाटणी देणारे धाडसी निर्णय; जेएलआरचे अधिग्रहण ते एअर इंडियाची घरवापसी
6
राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात नाही
7
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस; केंद्राला प्रस्ताव, VJNT, SBCचा समावेश
8
आणखी पाच समाजांच्या कल्याणासाठी महामंडळे; प्रत्येकी ५० कोटींचे भाग भांडवल दिले जाणार
9
विजयादशमीचा मुहूर्त टळणार; मविआत पेच, विदर्भ, मुंबईतील जागांवरील तिढा कायम
10
‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध
11
‘ज्ञानराधा’ला ईडीचा दणका; १ हजार कोटींची मालमत्ता जप्त; मुंबई, बीड, जालना येथील संपत्ती
12
विशेष मोहीम राबवून राजकीय होर्डिंग्ज हटवा; उच्च न्यायालयाचे राज्यातील सर्व पालिकांना आदेश
13
धनगर ऐवजी धनगड वाचावे, शुद्धीपत्रक एका रात्रीत रद्द; संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
14
अक्षय शिंदेसाठी ‘ते’च वाहन का निवडले? पोलिस चकमकप्रकरणी सीआयडीचा पोलिसांना सवाल
15
चीनने आपल्या ताकदीचा वापर शांततेसाठी करावा: तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते
16
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
17
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
18
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
19
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
20
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा

2022मध्ये एकाही काश्मिरी पंडिताने घाटीतून पलायन केले नाही; गृह राज्‍यमंत्र्यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 9:03 PM

नित्यानंद राय यांनी सांगितल्यानुसार, काश्मीर खोऱ्यात सध्या 6,514 काश्मीरी पंडित राहतात.

नवी दिल्ली: अत्याचाराला कंटाळून काश्मीर खोऱ्यातून गेल्या अनेक वर्षांमध्ये हजारो-लाखो काश्मिरी पंडितांनी पलायन केले आहे. केंद्रात नरेंद्र मोदी सरकार आल्यापासून या काश्मिरी पंडितांना सुरक्षा पुरवल्याचा दावा केला जातो. याबाबत आज केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय (Nityanand Rai) यांनी राज्यसभेत महत्वाची माहिती दिली.

नित्यानंद राय यांनी सांगितले की, सरकारी नोंदीनुसार 2022 मध्ये एकाही काश्मिरी पंडिताने काश्मीर खोऱ्यातून पलायन केले नाही. खोऱ्यात सध्या 6,514 काश्मीरी पंडित राहतात. 2022 मध्ये एकाही काश्मिरी पंडिताने स्थलांतर केले नसल्याचा दावा सरकारने केला आहे. सरकारने आकडेवारीसह माहिती दिली आहे. केंद्र सरकारने काश्मिरी पंडितांचा जिल्हावार तपशीलही दिला आहे. कोणत्या जिल्ह्यात किती काश्मीर पंडित राहतात हे सांगण्यात आले आहे.

जिल्हावार तपशील20 जुलै 2022 पर्यंत अनंतनागमध्ये 808 काश्मिरी पंडित राहत असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, कुलगाम जिल्ह्यात सर्वाधिक 2,639 काश्मिरी पंडित राहतात. पुलवामामध्ये 579, शोपियानमध्ये 320, श्रीनगरमध्ये 455, गंदरबलमध्ये 130, कुपवाडामध्ये 19, बांदीपोरामध्ये 66, बारामुल्लामध्ये 294 आणि बडगाममध्ये 1,204 काश्मिरी पंडित आहेत.

सरकारची विशेष योजनाविशेष म्हणजे काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकार आणि काश्मीर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान पॅकेज अंतर्गत राज्यातील सरकारी विभागांमध्ये नियुक्त केलेल्या काश्मिरी पंडितांना सुरक्षित जिल्ह्यात तैनात केले जात आहे. मनोज सिन्हा यांनी पीपल्स अलायन्स फॉर गुपकर डिक्लेरेशन (पीएजीडी) आणि भाजपच्या शिष्टमंडळाला कळवले होते की, खोऱ्यातील तहसील मुख्यालयावर नुकतेच झालेले दहशतवादी हल्ले पाहता, काश्मिरी पंडित कर्मचाऱ्यांची तैनाती सुरक्षित जिल्ह्यांमध्ये केली जाईल.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरRajya Sabhaराज्यसभाBJPभाजपाHome Ministryगृह मंत्रालय