शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

'अल्पसंख्याकांच्या विरोधात नाही, पण कोणीही विशेष नागरिक...'; नरेंद्र मोदींनी दिलं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2024 14:14 IST

Lok Sabha Election : आपण अल्पसंख्याकांच्या विरोधात नाही असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाचे विधान केलं आहे.

PM Narendra Modi : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात हिंदू मुस्लिम हे मुद्दे मोठ्या प्रमाणावर गाजत आहेत. अल्पसंख्याक समाजाबाबत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी महत्त्वाचे विधान केलं आहे. मी अल्पसंख्याकांविरुद्ध एक शब्दही उच्चारला नाही आणि भारतीय जनता पक्ष आजच नाही तर कधीच अल्पसंख्याकांच्या विरोधात नव्हता, असे पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे. तसेच आपण कुणालाही विशेष नागरिक मानायला तयार नाही आहोत, असेही मोदींनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी काँग्रेसकडून होत असलेल्या आरोपांबाबतही भाष्य केलं.

रविवारी रात्री उशिरा पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत मोदींनी अल्पसंख्यांकांबद्दल भाष्य केलं. निवडणूक भाषणे जातीयदृष्ट्या फूट पाडणारी आणि ध्रुवीकरण करणारी नाहीत हे सर्वांनाच माहिती आहे, असे पंतप्रधान मोदींनी यावेळी म्हटलं. विरोधकांकडू होत असलेली टीका पाहून पंतप्रधान मोदींनी भाष्य केलं. काँग्रेसने संविधानाच्या धर्मनिरपेक्षतेचा अवमान केल्याचा आरोपही पंतप्रधानांनी केला.

निवडणूक प्रचारादरम्यानच्या माझ्या भाषणांचा उद्देश व्होटबँकेचे राजकारण तसेच विरोधी पक्षांचे अल्पसंख्याकांना खूश करण्याच्या प्रयत्नांचा पर्दाफाश करणे हा आहे, असेही मोदी म्हणाले. यावेळी अल्पसंख्याकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबद्दल मोदींना मुलाखतीदरम्यान विचारण्यात आले असता त्यांनी प्रतिक्रिया दिली. "मी अल्पसंख्याकांविरोधात एक शब्दही बोललो नाही. मी फक्त काँग्रेसच्या व्होट बँकेच्या राजकारणाविरुद्ध बोलतोय. काँग्रेस संविधानाच्या विरोधात काम करत आहे, मी हेच सांगत होतो," असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

"बाबासाहेब आंबेडकर आणि जवाहरलाल नेहरू यांच्यासह भारतीय राज्यघटनेच्या रचनाकारांनी धर्माच्या आधारावर आरक्षण नसल्याचा निर्णय घेतला होता. आता तुम्ही त्याच्यापासून दूर जात आहात. त्यांचा खुलासा करणे ही माझी जबाबदारी आहे. त्यावेळी माझ्या पक्षाचा एकही सदस्य संविधान सभेत नव्हता. ही देशभरातील उल्लेखनीय लोकांची सभा होती," असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

"त्यांचे राजकारण तुष्टीकरणाचे आहे आणि माझे राजकारण 'सबका साथ, सबका विकास'चे आहे. आमचा सर्व धर्माच्या समानतेवर विश्वास आहे. आम्हाला सर्वांना सोबत घेऊन जायचे आहे. आम्ही कुणालाही विशेष नागरिक म्हणून स्वीकारायला तयार नाही. पण आम्ही सर्वांना समान मानतो," असं पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केलं. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा